नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सचिव देवजित सईकिया यांच्या वक्तव्यापूर्वी टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने बीसीसीआय च्या कठोर नियमांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या नवीन नियमांनुसार विदेश दौऱ्यादरम्यान खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहण्यासाठी दिला जाणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला आहे. यावर कोहलीने सडेतोड भूमिका मांडली. तो म्हणाला की, ‘हॉटेलच्या खोलीत एकटा उदास बसण्यापेक्षा मैदानावरच्या कठीण आणि तणावपूर्ण परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी मी नेहमीच आपल्या कुटुंबीयांना सोबत ठेवणे पसंत करतो,’ असे म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली होती. तथापि, बीसीसीआय ने बुधवारी स्पष्ट केले की, खेळाडूंसाठी लागू असलेले नियम तसेच कायम राहतील आणि त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. तसेच विराट कोहलीच्या नाराजी विधानानंतर बीसीसीआय सचिवांनी दिलेली ही प्रतिक्रिया खूप महत्त्वाची मानली जात आहे. कोहलीच्या नाराजीचा कसलाही परिणाम बीसीसीआयवर झालेला नाही. बीसीसीआय आपल्या धोरणावर ठाम राहणार आहे. बोर्डाचे सचिव सईकिया यांनी कोहलीच्या तक्रारीवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, ‘बीसीसीआय खेळाडूंच्या कुटुंबीयांसाठी असलेल्या सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कोणताही बदल करणार नाही. हे नियम संघाच्या व्यवस्थापन आणि खेळाडूंच्या भल्यासाठी तयार करण्यात आले आहेत.’
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…