मुंबईत दररोज तब्बल इतक्या लीटरची पाण्याची होते चोरी, आकडा ऐकून व्हाल हैराण

पाणीचोरी रोखण्यासाठी पाइपलाइनमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवणार


मुंबई (प्रतिनिधी): मुंबईत दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असून यातील ७०० दशलक्ष लिटर पाणीचोरी होते. ही पाणी चोरी रोखण्यासाठी पाइपलाइनमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यामुळे कंट्रोल रूममध्येच कळेल की पाणीचोरी, गळती कुठे होते, कोणी अतिरिक्त जोडणी केली आहे की नाही. ही यंत्रणा तयार करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला देण्यात येतील, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत सदस्य राजहंस सिंह यांनी मुंबईतील अपुरा पाणीपुरवठा आणि विविध भागांत होणारी पाणी चोरी थांबवावी, अशी मागणी लक्षवेधी मांडून केली. ते म्हणाले, मुंबईतील लोकसंख्या वाढत आहेत. त्यांना पाणीपुरवठा कसा करणार. त्यात कुर्ला, मानखुर्द, मालवणीमध्ये पालिका कर्मचाऱ्यांच्या संगनमताने पाणीचोरी होते.


मार्च महिन्यांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे यावर काष उपाययोजना करणार, असा सवाल सिंह यांनी केला. मुंबईत दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्येमुळे पाणीपुरवठा जास्त करावा लागणार आहे. त्यासाठी २०१३ साली गारगाई प्रकल्प विकसित करण्याला मुंबई महापालिकेने परवानगी दिले होते. दरम्यान, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी चार वर्षे लागणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईला अंदाजे ४४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबईतील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.


समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य करणारा पायलेट प्रकल्प मुंबई महापालिका राबवणार होती. त्यासाठी महापालिकेने ४०० कोटींची तरतूद केली आहे, त्यामुळे ४०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून मुंबईची पाणीटंचाई दूर करा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. त्यावर हे अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ आंतरराष्ट्रीय निविदा काढण्यात येऊन प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला देण्यात येईल, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : कलम ३७० हटवण्याचा निर्णय म्हणजे 'एक भारत, श्रेष्ठ भारत'च्या संकल्पनेला बळ; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले पंतप्रधान मोदी व अमित शाह यांना अभिवादन

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० (Article 370) आणि ३५A रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला सात वर्षे पूर्ण होत असताना

Government Hospital Catering Services : सरकारी रुग्णालयांतील खानपान सेवा आता महिला बचत गटांकडे

- २०० पेक्षा कमी खाटांच्या रूग्णालयांसाठी निर्णय; पारदर्शक गुणांकनाद्वारे जिल्हा स्तरावर निवड होणार मुंबई :

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra : अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा यांच्यात बिनसलं? १८ महिन्यांपासून राहतात वेगळे; ११ वर्षांच्या संसारानंतर काडीमोड घेणार ?

मुंबई : ग्लॅमर आणि झगमगाटाने वेढलेल्या सिनेसृष्टीतील कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य खरोखरच तितके सुखी आणि चमकदार

Mumbai Doctors Strike : मुंबईत निवासी डॉक्टरांचा संप; ओपीडी बंद, रुग्णांचे हाल सुरू

मुंबई : मुंबईतील महापालिका रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टरांच्या संपामुळे हजारो रुग्णांना मोठा मनस्ताप सहन

Mumbai Attack Threat : मुंबईवर ९ ते १८ ऑगस्टदरम्यान दहशतवादी हल्ल्याचा धोका ? 'एक्स'वरील पोस्टने खळबळ

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून मुंबईसह देशावर मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवणारी एक वादग्रस्त

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याचे ऑडिट!

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश; रोख रक्कम, सोने-चांदी आणि मौल्यवान वस्तूंच्या नोंदींची तपासणी