Indian Education System : देशातील सर्व शिक्षण मंडळे आता समान पातळीवर

पुणे : केंद्र सरकारकडून देशभरातील सर्व शिक्षण मंडळे समान पातळीवर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अानुषंगाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) यांच्यातर्फे १७ ते २१ मार्च या कालावधीत नववी ते बारावीच्या शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, त्यात समग्र प्रगतीपत्रक माध्यमिक स्तर व प्रश्नपत्रिकांचे प्रमाणीकरण याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२३, राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ मधील बदलांना अनुसरून शिक्षकांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने पुण्यातील यशदा येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण विभागाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले.



राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, एनसीईआरटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि परखच्या विभागप्रमुख डॉ. इंद्राणी भादुरी, राज्य मंडळ अध्यक्ष, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, योजना संचालक डॉ. महेश पालकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील उपस्थित राहणार आहेत. इयत्ता नववी ते बारावी या वर्गांतील विद्यार्थ्यांचा समग्र विकास आणि प्रगतीशी संबंधित मूल्यांकन प्रक्रियेसाठी परख या राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.


परख अंतर्गत समग्र प्रगतीपत्रक ही संकल्पना मांडण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वंकष प्रगतीचे मूल्यांकन करण्याचा उद्देश त्यामागे आहे. त्यामुळे समग्र प्रगतीपत्रक, प्रश्नपत्रिका निर्मिती, पृथक्करण व प्रमाणीकरण करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. विविध राज्यांच्या प्रश्नपत्रिकांच्या तुलनात्मक अभ्यासावरही या कार्यशाळेत प्रकाश टाकला जाणार आहे. राज्य मंडळाकडून निर्मित केल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिका अधिकाधिक अचूक आणि उच्चतम दर्जाच्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

Comments
Add Comment

Leopard Conflict : 'गोळी' की 'नसबंदी'? बिबट्याला पकडण्यासाठी सरकारचा मास्टरस्ट्रोक! तब्बल 'इतक्या' कोटींचा खर्च करणार अन्...

जुन्नर : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर (Junner) आणि उत्तर पुणे परिसरात बिबट्यांच्या (Leopard) संख्येत सातत्याने वाढ होत आहे,

Satbara Utara : ऐतिहासिक निर्णय! ६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा; भूखंड विनाशुल्क नियमित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश, ३ कोटी नागरिकांना थेट लाभ

मुंबई : राज्यातील नागरिकांसाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. तुकडेबंदी

Nashik Malegaon Crime News : सूडापोटी 'सैतानी कृत्य'! ३ वर्षीय चिमुरडीचं लैंगिक शोषण करून डोकं दगडाने ठेचून...गांभीर्याने तपास सुरू

मालेगाव : नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील मालेगाव तालुका सध्या एका हादरवून टाकणाऱ्या आणि अमानुष घटनेने स्तब्ध झाला आहे.

Ahilyanagar News : बिबट्याच्या भीतीने शाळांच्या वेळेत तातडीने बदल! अहिल्यानगर-पुण्यातील तालुक्यांत पहिली ते चौथीसाठी वेगळी, तर माध्यमिकसाठी वेगळी वेळ जाहीर

अहिल्यानगर : अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक

कडाक्याच्या थंडीत पुणे पालिकेची शेकोटीवर बंदी! प्रदुषण नियंत्रणासाठी घेतला निर्णय

पुणे: राज्यभरात मागील आठवड्यांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे शरीराला ऊब मिळावी म्हणून अनेकजण शेकोटी

पुण्यात गुरुवारी पाणीबाणी, पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

पुणे : पुणे शहरातील जलकेंद्रांच्या दुरुस्ती कामामुळे गुरुवार २० नोव्हेंबर रोजी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद