Raj Thackeray Social Media Post : ... म्हणून मला यशासाठी कोणताही शॉर्टकट घ्यावा लागत नाही; राज ठाकरे यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती. अखंड विश्वाचा आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिलं जात. आज त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील अनेक नेतेमंडळींनी सोशल मीडियाद्वारे त्यांना अभिवादन केले आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना 'एक्स' या सोशल मीडियाद्वारे अभिवादन केले आहे. त्यांची ही सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. मला यशासाठी कोणताही शॉर्टकट घ्यावा लागत नाही. माझ्या संपूर्ण आयुष्यावर शिवचरित्राचा प्रभाव आहे असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.



काय आहे राज ठाकरे यांची 'एक्स' पोस्ट


"आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती. दरवर्षी महाराजांची जयंती तिथीनुसार आणि तारखेनुसार साजरी होते. यावर मध्येमध्ये वाद पण होत असतात. खरंतर महाराजांची जयंती ही ३६५ दिवस साजरी व्हायला हवी इतके महाराज लोकोत्तर पुरुष होते. पण ३६५ दिवस साजरी करायची म्हणजे शिवचरित्रातून ३६५ दिवस काही ना काही बोध घेऊन रोजच्या आयुष्यात मार्गक्रमण केलं पाहिजे. वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचं स्वप्न पहायचं, त्याची ध्येयधोरण आखायची आणि स्वतःच आर्थिक चलन आणायचं , फार्सी भाषा नाकारून स्वतःचा मराठी शब्दकोश निर्माण करायचा , पुढे एक एक किल्ले जिंकायचे आणि लहान वयातच पीछेहाट पण सहन करायची आणि हे करताना आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांचे मनोधैर्य कुठेही खचू द्यायचे नाही याला एक अद्वितीय प्रतिभाच असली पाहिजे. महाराजांच्या आयुष्यात मधला एक कालखंड असा एक जाणवतो की त्यात फार काही घडत नाही असं वरवर बघणाऱ्याला वाटेल, पण त्याच काळात महाराजांनी खूप पुढची आखणी केली.





आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे तसं, जेंव्हा बाहेर वादळ असतं तेंव्हा शांत आत बसून शक्ती साठवून ठेवावी आणि जेंव्हा बाहेर शांतता असते तेंव्हा आपलं वादळ निर्माण करावं. महाराजांच्या आयुष्याकडे बघितलं की नेहमी कुतूहल वाटतं की ही समज इतक्या लहान वयात कुठून आली असेल. आजकाल छोट्या छोट्या पीछेहाटीने किंवा नकाराने नैराश्य येण्याच्या काळात, प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे पारायण केलं तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा महाराजांनी किती शांतपणे स्वराज्य उभं केलं हे जाणवेल, आणि मग असली किरकोळ नैराश्य कधीच येणार नाहीत. माझ्या संपूर्ण आयुष्यावर शिवचरित्राचा प्रभाव आहे, त्यामुळे कधीच नैराश्य, नकारात्मकता मला स्पर्शून पण जात नाही आणि झटपट यशासाठी कुठलाही शॉर्टकट घ्यावासा वाटत नाही. मला जे योग्य वाटतं ते मी विचारांती बोलतो, आणि हे करताना महाराष्ट्र घडवण्याचं माझं जे ध्येय आहे त्यावरची अगाढ श्रद्धा टिकून राहते हे सगळं शिवचरित्राने मला दिल आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांकडून सदैव मिळत राहू दे हीच इच्छा." (Raj Thackeray)

Comments
Add Comment

'मुंबई अंडरवर्ल्ड' पुन्हा चर्चेत: छोटा राजनचा खास साथीदार डीके राव खंडणी प्रकरणी अटकेत

मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा दीर्घकाळचा साथीदार आणि कुख्यात गुंड रवी मल्लेश बोऱ्हा उर्फ डीके राव (५९) याला

माजी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याची काळजी; राबवली अशी मोहीम

मुंबई (खास प्रतिनिधी) : आपण ज्या शाळेत शिकून मोठे झालो आहोत आणि मोठ्या हुद्यावर पोहोचल्यानंतर आपल्या शाळेबाबत

कोस्टल रोडशी संलग्न ५३ हेक्टरचे सुशोभीकरण, ३० वर्षांकरता रिलायन्सच्या ताब्यात राहणार जागा, असे दिले अधिकार

मुंबई (सचिन धानजी) : धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता दक्षिण प्रकल्पांतर्गत

मुंबईत यंदा छट पुजा ठिकाणांमध्ये वाढ, आणखी २० पूजा ठिकाणे वाढणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई परिसरात छट पूजा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार असून, शहर आणि उपनगरातील एकूण ४०

‘श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धा - २०२५’ : परिमंडळनिहाय सर्वोत्तम कोणती ठरली नैसर्गिक, कृत्रिम गणेशमूर्ती विसर्जन स्थळे

मुंबई (खास प्रतिनिधी) : यंदाचा श्रीगणेशोत्सव गणेशभक्तांसोबतच प्रशासनासाठी देखील वेगळा होता. पर्यावरणपूरक

मनसे-ठाकरे युतीला काँग्रेसचा विरोध! काँग्रेसला एकटे पाडण्याचा शिजतोय कट! ‘मविआ’ फुटण्याच्या उंबरठ्यावर?

काँग्रेसला एकटे पाडण्यासाठी संजय राऊतांनी साधला शरद पवारांशी संपर्क मुंबई: विधानसभा निवडणुकीत मोठा फटका