Mumbai Temperature : उन्हाची तीव्रता वाढल्याने बाटली बंद पाण्याच्या मागणीत वाढ

मुंबई : उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे बाटली बंद पाण्याच्या मागणीत चांगलीच वाढ झाली आहे. मात्र, या पाण्याच्या शुद्धतेविषयी आता अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शुद्ध पाण्याच्या नावाखाली केवळ बाटलीतून गार पाणी दिले जात असल्याचे काही सजग नागरिक सांगत आहेत.


नागरिक जे बाटलीबंद पाणी खरेदी करत आहेत, त्या बाटलीवर पाणी कधी भरले, ते शुद्ध आहे का, ते कधीपर्यंत वापरायचे आहे. याविषयी काहीच उल्लेख नसतो. काही व्यावसायिक वापरलेल्या बाटल्यांमध्ये नळाचे पाणी भरून मिनरल वॉटरच्या नावाखाली विकत असतात. अनेक नागरिक पाणी शुद्धतेच्या मानांकनाबाबत अनभिज्ञ असतात, त्यामुळे त्यांच्याकडून या बाबीकडे दुर्लक्ष होते. नेमका त्याचाच गैरफायदा घेत पाणीविक्रेते ग्राहकांची लूट करीत आहेत. पाणी विक्रीचा व्यवसाय ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.



बाटलीबंद पाणी विकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना आवश्यक असतो. तथापि, परवाना न काढताच काही उद्योजक पाणी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. याकडे अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather : आनंदाची बातमी! महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, कोकणात ४८ तासांत पाऊस पडणार

मुंबई : मागील दीड महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. आता राज्यात पुन्हा एकदा

Malad Sewage Treatment Plant : मालाड मलजल प्रक्रिया केंद्राला खारफुटीसह इतर परवानगी प्राप्त; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी):  मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाने ४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मालाड मलजल

Juhu Chowpatty : जुहू समुद्रकिना-याची स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नेमणूक

मागील एक महिन्यांपासून जेसीबी, डंपरचे कंत्राट आले होते संपुष्टात मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मागील पावसाळ्यात

Mumbai's water stock : मुंबईचा पाणी साठा ५० टक्के पार; सर्व धरणांमध्ये सध्या ५०.७७ टक्के पाणीसाठा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील पाण्याचा साठा जा मागील काही दिवसांपासून ५०

Desalinate Seawater : समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी जलबोगद्याच्या कामासाठी कंत्राटदाराची निवड

पंपिंग स्टेशनपासून ते कांदिवली महावीर नगरपर्यंत उभारणार जलबोगदा मुंबई (सचिन धानजी) : मनोरी येथे समुद्राच्या

BMC: रुग्णांना केंद्रस्थानी ठेवत सर्व संबंधितांनी जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम करा

अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांचे महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी):