Gold smuggling : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडलं ८.४७ कोटी रुपयांचं सोनं

  57

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी चार प्रकरणांमध्ये मिळून एकूण १०.९२३ किलो वजनाचं सोनं पकडलं. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ८.४७ कोटी रुपये आहे. या चार प्रकरणांमध्ये पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांपैकी ३ जण विमानतळावरील खासगी कंपनीचे कर्मचारी आहेत.



पहिल्या प्रकरणात कस्टम अधिकाऱ्यांनी एका खासगी कंपनीच्या विमानतळावरील कर्मचाऱ्याला संशयावरून अटक केली. या कर्मचाऱ्याच्या पँटच्या खिशात मेणाच्या वड्यांमध्ये लपवलेल्या सोन्याच्या सहा अंडाकृती आकाराच्या कॅप्सूल आढळल्या. या सोन्याची किंमत २.२७ कोटी रुपये आहे. दुसऱ्या प्रकरणातही कस्टम अधिकाऱ्यांनी एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक केली. त्याने अंतर्वस्त्रात मेणाच्या वड्यांमध्ये लपवलेल्या सोन्याच्या अंडाकृती आकाराच्या सात कॅप्सूल आढळल्या. या सोन्याची किंमत २.३६ कोटी रुपये आहे. तिसऱ्या प्रकरणामध्येही कस्टम अधिकाऱ्यांनी एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक केली. त्याने अंतर्वस्त्रात मेणाच्या वड्यांमध्ये लपवलेले १.३१ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. सोन्याच्या तस्करीच्या आरोपात कस्टमने तिन्ही खासगी कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. चौथ्या प्रकरणात विमानतळावरील कचऱ्याच्या काळ्या पिशव्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीवेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या काळ्या पिशव्यांमध्ये प्रत्येकी एक या पद्धतीने काळ्या रंगाच्याच पाउचमध्ये लपवलेले सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची किंमत २.५३ कोटी रुपये आहे. यानंतर आणखी दोन जणांना अटक करण्यात आली. कस्टम विभागाने सोन्याच्या तस्करीच्या चार प्रकरणांमध्ये एकूण पाच जणांना अटक केली आहे.
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.