Devendra Fadnavis : ...म्हणून औरंगजेबाच्या कबरीला दिलं जातंय संरक्षण

मुंबई : औरंगजेबाच्या कबरीला पुरातत्व विभागाने संरक्षण दिले आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाला तिथे संरक्षणाची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. पण कबरीला संरक्षण दिले तरी महाराष्ट्र शासन औरंगजेबाचे आणि त्याच्या कबरीचे कौतुक करत नाही, करणार नाही. औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होणार नाही; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली.

d

आज आपण आपल्या मंदिरात जाऊन ईष्ट देवतेची साधना करू शकतो. याचे एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांनी देश, देव, धर्माची लढाई जिंकली, म्हणून तुम्ही-आम्ही हिंदू आहोत. आपल्या देवतेचे दर्शन घेऊ शकतो; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.



भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराला सुंदर तटबंदी बांधण्यात आली आहे. अतिशय चांगला बुरुज आहे. दर्शनी प्रवेशाचा मार्ग आहे. बगिच्याची जागा आहे. शिवरायांच्या जीवनातील सगळे प्रसंग त्या ठिकाणी पहायला मिळतात; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



'ज्या काळात या देशातील राजे, रजवाडे मुगलांची, परकीय आक्रमकांची मनसबदारी मिळवून त्यांच्या अधिपत्याखाली काम करत होते. ज्यावेळेला लढण्याची शक्ती क्षीण झाली होती, कोणाचे तरी सरदार म्हणून मिरवण्याची प्रथा निर्माण झाली होती, त्यावेळी आई जिजाऊंचे संस्कार घेऊन यातून मुक्तता मिळवण्यासाठी, या परकियांना धडा शिकवला पाहिजे, यासाठी शिवाजी महाराज लढले. आई जिजाऊंनी शिवरायांना घडवले;' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आपण प्रभू श्रीरामांना युगपुरुष म्हणतो. प्रभू श्रीराम हे युगपुरुष का आहेत?. प्रभू श्रीराम ईश्वर होते, मग रावणाशी लढण्यासाठी त्यांना सैन्याची आवश्यकता का होती ? त्यांनी चमत्काराने रावणाला हरवायला पाहिजे होतं. पण ते युगपुरुष होते. त्यांना असुरी शक्ती विरोधात लढू शकतो हा आत्मविश्वास समाजात निर्माण करायचा होता. समाज घडवायचा होता. यासाठीच त्यांनी समाजातील छोट्यात-छोट्या व्यक्तींना एकत्र केलं. त्यांच्यात विश्वास निर्माण केला. त्याच बळावर जगातील मोठ्या अधर्मी शक्तीचा नि:पात केला. रावणाची शक्ती कितीही मोठी असली, तरी ती अर्धमाची शक्ती आहे. अर्धमाच्या शक्तीला हरवण्याची ताकद माझ्यात आहे, असा विश्वास समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत निर्माण केला. म्हणून एका नव्या युगाची निर्मिती करणारे प्रभू श्रीराम युगपुरुष आहेत; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र केलं. शेतकरी, अलुतेदार - बलुतेदार यांना एकत्र केलं. त्यांच्यात पौरुषत्व निर्माण केलं. देव, देश, धर्मकारिता लढण्यासाठी विचारांचं बीजारोपण केलं. आपल्याला राजा, सिंहासनाकरता लढायचं नाहीय तर देव, देश धर्माकरता लढायचं आहे हा विचार रुजवला. यातून शिवरायांनी असे मावळे घडवले ज्यांनी खानाच्या फौजांशी लढाई केली. खानाच्या लाखांच्या फौजा यायच्या, पाच हजार मावळे त्या लाखांच्या फौजांना पराभूत करायचे, पळवून लावायचे. हे महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या प्रेरणेतून घडले. पुढे मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले. याच कारणासाठी कौतुक करायचे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे करायचे; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Comments
Add Comment

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम सारथीने सुरू करावेत : विखे पाटील

मुंबई : उद्योजकांच्या संघटनांशी संपर्क ठेवून औद्योगिक व सेवा क्षेत्रात मागणी असलेल्या कौशल्य प्रशिक्षणाचे

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,