नवरा-बायकोमध्ये झाला वाद, पतीने पेटवले घर

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये घरगुती भांडणामुळे एका पतीने आपल्याच घराला आग लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोबतच पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. घटनेची सूचना मिळताच अग्निशमन दलाचे जवान तेथे पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.


हे प्रकरण मेरठच्या कंकड ठाणे क्षेत्रातील अमोलिक कॉलनीमधील आहे. येथे अग्निशमन दलाला दुपारी एका घराला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने दलाचे जवान तेथे पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. चौकशीदरम्यान असे समजले की हे घर भूपेंद्र नावाच्या व्यक्तीचे असून तो टेलरिंगचे काम करतो. भूपेंद्रने गृहक्लेशामुळे घरात आग लावली.


भूपेंद्रचे १० वर्षांपूर्वी निधीशी लग्न झाले होते. दोघांमध्ये पैशावरून सातत्याने वाद होत असे. रविवारी पुन्हा एकदा भूपेंद्र आणि निधी यांच्यात वाद झाला. निधी कशीतरी घरातून बाहेर पडली आणि जवळच्या आपल्या माहेरी गेली. भूपेंद्रला वाटले की निधी आतमध्ये आहे आणि त्याने घराला आग लावून दिली असा आरोप त्याच्यावर आहे. त्यानंतर तो तेथून पळून गेला.


घराला आग लागल्याने संपूर्ण घर धुराने भरून गेले. मोठमोठ्या आगीच्या ज्वाळा निघत होत्या. शेजाऱ्यांनी आगीचे लोळ पाहिले आणि फायर सर्व्हिस टीमला सूचना दिली. त्यांनी तातडीने तेथे धाव घेत आग विझवली.


आपले घर जळताना पाहून निधी आपल्या मुलांसह आणि आईसह तेथे पोहोचली. निधीने सांगितले, पती सातत्याने तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. तिने नकार दिला तेव्हा तो भांडायला लागला. त्याला राग आला. आधी त्याने मला खोलीत बंद केले होते. आणि त्यानंतर बाईकमधून पेट्रोल काढू लागला. शेजारच्या काकींनी मला यातून सोडवले आणि मुलांना घेऊन मी माहेरी गेली. या दरम्यान त्याने घराला आग लावली. मलाही जाळून मारण्याचा प्रयत्न करत होता.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी