नवरा-बायकोमध्ये झाला वाद, पतीने पेटवले घर

  69

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये घरगुती भांडणामुळे एका पतीने आपल्याच घराला आग लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोबतच पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. घटनेची सूचना मिळताच अग्निशमन दलाचे जवान तेथे पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.


हे प्रकरण मेरठच्या कंकड ठाणे क्षेत्रातील अमोलिक कॉलनीमधील आहे. येथे अग्निशमन दलाला दुपारी एका घराला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने दलाचे जवान तेथे पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. चौकशीदरम्यान असे समजले की हे घर भूपेंद्र नावाच्या व्यक्तीचे असून तो टेलरिंगचे काम करतो. भूपेंद्रने गृहक्लेशामुळे घरात आग लावली.


भूपेंद्रचे १० वर्षांपूर्वी निधीशी लग्न झाले होते. दोघांमध्ये पैशावरून सातत्याने वाद होत असे. रविवारी पुन्हा एकदा भूपेंद्र आणि निधी यांच्यात वाद झाला. निधी कशीतरी घरातून बाहेर पडली आणि जवळच्या आपल्या माहेरी गेली. भूपेंद्रला वाटले की निधी आतमध्ये आहे आणि त्याने घराला आग लावून दिली असा आरोप त्याच्यावर आहे. त्यानंतर तो तेथून पळून गेला.


घराला आग लागल्याने संपूर्ण घर धुराने भरून गेले. मोठमोठ्या आगीच्या ज्वाळा निघत होत्या. शेजाऱ्यांनी आगीचे लोळ पाहिले आणि फायर सर्व्हिस टीमला सूचना दिली. त्यांनी तातडीने तेथे धाव घेत आग विझवली.


आपले घर जळताना पाहून निधी आपल्या मुलांसह आणि आईसह तेथे पोहोचली. निधीने सांगितले, पती सातत्याने तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. तिने नकार दिला तेव्हा तो भांडायला लागला. त्याला राग आला. आधी त्याने मला खोलीत बंद केले होते. आणि त्यानंतर बाईकमधून पेट्रोल काढू लागला. शेजारच्या काकींनी मला यातून सोडवले आणि मुलांना घेऊन मी माहेरी गेली. या दरम्यान त्याने घराला आग लावली. मलाही जाळून मारण्याचा प्रयत्न करत होता.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे