Ram Mandir : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सरकारला दिले ३९६ कोटी रुपये

अयोध्या : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून अयोध्येतील मंदिराच्या कामांना वेग आला. मंदिराची निर्मिती तसेच मंदिराशी संबंधित सर्व कामांची जबाबदारी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची अर्थात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाची आहे. राम मंदिराचे आतापर्यंत ९६ टक्के काम पूर्ण झाले आहे. मंदिराचे राहिलेले काम पण वेगात सुरू आहे. जून २०५ पर्यंत मंदिर निर्मितीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मंदिराशी संबंधित वेगवेगळ्या कामांसाठी म्हणून श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सरकार दफ्तरी आतापर्यंत ३९६ कोटी रुपये जमा केले आहेत.







श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची बैठक अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला सात ट्रस्टी अर्थात विश्वस्त आणि चार विशेष आमंत्रित सदस्य उपस्थित होते. विशेष आमंत्रित म्हणून केशव पराशरण, विमलेंद्र मोहन मिश्र, युगपुरुष परमानंद, नृपेंद्र मिश्र उपस्थित होते. बैठकीत राम मंदिराच्या निर्मितीच्या प्रगतीवर चर्चा झाली. महामंत्री चंपत राय यांनी सांगितले की, ५ फेब्रुवारी २०२० रोजी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट अर्थात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाची स्थापना झाली. ट्रस्टच्या स्थापनेपासून ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत म्हणजेच मागील पाच वर्षात ट्रस्टच्या खात्यातून सरकारच्या विविध विभागांना ३९६ कोटी रुपये देण्यात आले. यात जीएसटी २७२ कोटी, टीडीएस ३९ कोटी, लेबर सेस १४ कोटी, ईएसआय ७.४ कोटी, विमा ४ कोटी, जन्मभूमीच्या नकाशासाठी अयोध्या विकास प्राधिकरणला ५ कोटी, अयोध्येतील जमीन खरेदीसाठी स्टँप ड्युटी अर्थात स्टँप शुल्क २९ कोटी, वीज बील १० कोटी, रॉयल्टी १४.९ कोटी रुपये यांचा समावेश आहे. दगडांची रॉयल्टी राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांना देण्यात आली आहे.

मागील पाच वर्षाचत मंदिर निर्मितीवर २१५० कोटी रुपये खर्च झाले. हा निधी समाजाकडून ट्रस्टला मिळाला. सरकारी तिजोरीतून एक पैसा पण मंदिराच्या बांधकामासाठी वापरलेला नाही. मागील पाच वर्षात भाविकांनी ९४४ किलो चांदी दान केली आहे. ही ९२ टक्के शुद्ध चांदी आहे.
Comments
Add Comment

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय