Ram Mandir : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सरकारला दिले ३९६ कोटी रुपये

अयोध्या : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून अयोध्येतील मंदिराच्या कामांना वेग आला. मंदिराची निर्मिती तसेच मंदिराशी संबंधित सर्व कामांची जबाबदारी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची अर्थात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाची आहे. राम मंदिराचे आतापर्यंत ९६ टक्के काम पूर्ण झाले आहे. मंदिराचे राहिलेले काम पण वेगात सुरू आहे. जून २०५ पर्यंत मंदिर निर्मितीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मंदिराशी संबंधित वेगवेगळ्या कामांसाठी म्हणून श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सरकार दफ्तरी आतापर्यंत ३९६ कोटी रुपये जमा केले आहेत.







श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची बैठक अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला सात ट्रस्टी अर्थात विश्वस्त आणि चार विशेष आमंत्रित सदस्य उपस्थित होते. विशेष आमंत्रित म्हणून केशव पराशरण, विमलेंद्र मोहन मिश्र, युगपुरुष परमानंद, नृपेंद्र मिश्र उपस्थित होते. बैठकीत राम मंदिराच्या निर्मितीच्या प्रगतीवर चर्चा झाली. महामंत्री चंपत राय यांनी सांगितले की, ५ फेब्रुवारी २०२० रोजी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट अर्थात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाची स्थापना झाली. ट्रस्टच्या स्थापनेपासून ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत म्हणजेच मागील पाच वर्षात ट्रस्टच्या खात्यातून सरकारच्या विविध विभागांना ३९६ कोटी रुपये देण्यात आले. यात जीएसटी २७२ कोटी, टीडीएस ३९ कोटी, लेबर सेस १४ कोटी, ईएसआय ७.४ कोटी, विमा ४ कोटी, जन्मभूमीच्या नकाशासाठी अयोध्या विकास प्राधिकरणला ५ कोटी, अयोध्येतील जमीन खरेदीसाठी स्टँप ड्युटी अर्थात स्टँप शुल्क २९ कोटी, वीज बील १० कोटी, रॉयल्टी १४.९ कोटी रुपये यांचा समावेश आहे. दगडांची रॉयल्टी राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांना देण्यात आली आहे.

मागील पाच वर्षाचत मंदिर निर्मितीवर २१५० कोटी रुपये खर्च झाले. हा निधी समाजाकडून ट्रस्टला मिळाला. सरकारी तिजोरीतून एक पैसा पण मंदिराच्या बांधकामासाठी वापरलेला नाही. मागील पाच वर्षात भाविकांनी ९४४ किलो चांदी दान केली आहे. ही ९२ टक्के शुद्ध चांदी आहे.
Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला