Aurangzeb's tomb : औरंगजेबाची कबर शासनाने काढावी

बाबरी ढाच्याप्रमाणे कारसेवा करण्याचा विहिंपसह बजरंग दलाचा इशारा


पुणे  : गुलामगिरीची, लाचारीची, आणि अत्याचारांची आठवण करून देणारी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर शासनाने लवकरात लवकर काढून टाकावी, अशी समस्त हिंदू समाजाची मागणी आहे. अन्यथा बाबरी ढाच्याप्रमाणे कारसेवा करून ही कबर उद्ध्वस्त करण्याचा इशारा विहिंप आणि बजरंग दलाच्या वतीने देण्यात आला. शिवजयंतीचे औचित्य साधून सोमवारी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात येणार आहे.



विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री किशोर चव्हाण, बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन आणि भेगडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. चव्हाण म्हणाले, ‘आपले संपूर्ण आयुष्य दगाबाजी, विश्वासघात व हिंदू द्वेष यामध्ये घालविणारा, छत्रपती संभाजी महाराज यांचा चाळीस दिवस छळ करणाऱ्या औरंगजेबाची कबर म्हणजे त्याने केलेल्या क्रूर आणि अन्यायाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे, त्यामुळे कबर हटवली गेली पाहिजे. औरंगजेबाच्या कबरीमुळे आजही त्याच्या विचारसरणीचे अनुयायी इतिहासावर बोट ठेवून त्याच मुघल शासकाच्या पावलावर पाऊल ठेवत या हिंदुस्थानात शरिया कायद्यानुसार वागत आहेत.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणाला कलाटणी; मुलीने फिरवली बाजी निवडली पोलिसांची गाडी

पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका मधील भिगवण येते घडलेल्या अपहरण प्रकरणाचे दिवसेंदिवस नवीन पैलू उलघडत जात

कानिफनाथ यात्रेत वादाची ठिणगी; मुस्लिम व्यावसायिकांची दुकाने करणार बंद

अहिल्यानगर : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि भटक्यांची पंढरी म्हणेजच श्री क्षेत्र मढीची कानिफनाथ

Beed: बीडमधील संतापजनक प्रकार; दहावीच्या विद्यार्थ्यांचा पेपर चक्क मंडपात

बीड: राज्यात इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरू झाली आहे. याच दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये शिक्षण

नरहरी झिरवाळ यांच्याकडून खासगी सचिवाची हकालपट्टी

मुंबई: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी

...तर एसटी तिकीट दर भरावा लागेल; तिकीट सवलतींसाठी एसटीचे नवे नियम काय?, जाणून घ्या

पुणे: महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची समोर येत आहे. एसटी प्रवासात विविध सवलत योजनांचा लाभ घेताना

एसआयआर आता २२ राज्यांमध्ये होणार; नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी 'हे' कागदपत्रे तयार ठेवा

दिल्ली: बनावट मतदार याद्या रोखण्यासाठी आणि बनावट मतदारांची नावे वगळण्यासाठी, निवडणूक आयोगाने आता देशभरात विशेष