Kolhapur Accident : कोल्हापूरमधील धक्कादायक घटना, धावत्या गाडीत हॉर्ट अॅटॅक

कोल्हापूर : टेंबलाई नाका चौकातून टाकाळा मार्गे राजारामपुरीकडे जाणार्‍या उड्डाणपुलाजवळ भरधाव कारने रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या दुचाकी, रिक्षांसह नऊ वाहनांना उडवले. या दुर्घटनेत राजारामपुरी येथील धीरज शिवाजीराव पाटील या ५५ वर्षांच्या उद्योजकाचा मृत्यू झाला. ते राजारामपुरीतील पाचव्या गल्लीत वास्तव्यास होते. कार चालवत असतानाच धीरज पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि हा अपघात घडला, अशी शक्यता पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती व्यक्त केली आहे.







कोल्हापूर शहरातील टेंबलाई नाका चौकातून टाकाळा मार्गे राजारामपुरीकडे जाणार्‍या उड्डाणपुलाजवळ धीरज शिवाजीराव पाटील हे त्यांच्या कारमधून जात होते. ते ताराबाई पार्क परिसरातील हॉटेलमध्ये जेवण करून मध्यरात्री दोनच्या सुमारास टेंबलाई नाका, टाकाळामार्गे राजारामपुरी येथील आपल्या निवासस्थानाकडे कारने जात होते. यावेळी अचानक त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि भरधाव वेगात असलेली त्यांची कार उड्डाणपुलाजवळ रस्त्याच्या एका बाजूला रिक्षा, मोपेड, दुचाकीसह एकूण नऊ वाहनांना धडक देऊन पुढे गेली. कार पुढे जाऊन रस्त्यावर कचरा कोंडाळ्याजवळ जाऊन थांबली.





मध्यरात्र असल्याने या अपघातवेळी मोठा आवाज झाला. आवाज ऐकून घाबरलेले नागरिक पटकन रस्त्यावर आले. यावेळी रस्त्यावर तुटलेल्या वाहनांचा खच पडला होता. शिवाय, एक कार पुढे कचऱ्याजवळ जाऊन थांबलेली दिसली. हे बघून नागरिकांनी पोलिसांना बोलावले. पोलीस पथक घटनास्थळी आले. पोलिसांनी धीरज पाटील यांना रुग्णालयात नेले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केली आणि धीर पाटील यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. कोल्हापूरमध्ये झालेल्या या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओतून अपघाताच्या तीव्रतेचा अंदाज येतो.
Comments
Add Comment

Vijayrao Deshmukh passes away: प्रख्यात शिवकथाकार विजयराव देशमुख यांचं निधन, मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

मुंबई: धर्मभास्कर प. पू. सद्गुरूदास महाराज उपाख्य शिवकथाकार विजयराव देशमुख यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या

Nagpur News : नागपूर हादरलं! १२ वीच्या विद्यार्थ्याचा ११ वीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ काढून धमकी दिली अन् नको नको ते...

नागपूर : शिक्षण आणि परीक्षेचे वय असलेल्या तरुणांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्याची धक्कादायक घटना

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी निधी वाढवून मिळावा; मंत्री छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन २०२५-२६ साठी ९०० कोटी रुपयांची तरतूद होती. सन २०२६ - २७ साठी ही ६९१.९०

Pune: भाजपाने पुण्यात उचललं कठोर पाऊल; ६९ बंडखोर सहा वर्षांसाठी निलंबित, 'या' मोठ्या नेत्यांचा समावेश

पुणे : नुकत्याच राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये अनेक घडामोडी

Mumbai-Pune ExpressWay : चक्क भाजलेल्या हातांनी रोखला मृत्यू! पेरूच्या खुट्टीनं टळला मोठा अनर्थ; एक छोटी चूक अन् १० किमीचा परिसर झाला असता खाक

मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर नुकत्याच झालेल्या महाभीषण वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

Weather Update: महाराष्ट्रातील वातावरणात बदल, कोकण ते विदर्भापर्यंत पुन्हा अलर्ट, ११ फेब्रुवारीला कसं असेल हवामान?

मुंबई: महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानात बदल दिसून येत आहे. हिवाळी थंड आता बऱ्याच प्रमाणात