Kolhapur Accident : कोल्हापूरमधील धक्कादायक घटना, धावत्या गाडीत हॉर्ट अॅटॅक

कोल्हापूर : टेंबलाई नाका चौकातून टाकाळा मार्गे राजारामपुरीकडे जाणार्‍या उड्डाणपुलाजवळ भरधाव कारने रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या दुचाकी, रिक्षांसह नऊ वाहनांना उडवले. या दुर्घटनेत राजारामपुरी येथील धीरज शिवाजीराव पाटील या ५५ वर्षांच्या उद्योजकाचा मृत्यू झाला. ते राजारामपुरीतील पाचव्या गल्लीत वास्तव्यास होते. कार चालवत असतानाच धीरज पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि हा अपघात घडला, अशी शक्यता पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती व्यक्त केली आहे.







कोल्हापूर शहरातील टेंबलाई नाका चौकातून टाकाळा मार्गे राजारामपुरीकडे जाणार्‍या उड्डाणपुलाजवळ धीरज शिवाजीराव पाटील हे त्यांच्या कारमधून जात होते. ते ताराबाई पार्क परिसरातील हॉटेलमध्ये जेवण करून मध्यरात्री दोनच्या सुमारास टेंबलाई नाका, टाकाळामार्गे राजारामपुरी येथील आपल्या निवासस्थानाकडे कारने जात होते. यावेळी अचानक त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि भरधाव वेगात असलेली त्यांची कार उड्डाणपुलाजवळ रस्त्याच्या एका बाजूला रिक्षा, मोपेड, दुचाकीसह एकूण नऊ वाहनांना धडक देऊन पुढे गेली. कार पुढे जाऊन रस्त्यावर कचरा कोंडाळ्याजवळ जाऊन थांबली.





मध्यरात्र असल्याने या अपघातवेळी मोठा आवाज झाला. आवाज ऐकून घाबरलेले नागरिक पटकन रस्त्यावर आले. यावेळी रस्त्यावर तुटलेल्या वाहनांचा खच पडला होता. शिवाय, एक कार पुढे कचऱ्याजवळ जाऊन थांबलेली दिसली. हे बघून नागरिकांनी पोलिसांना बोलावले. पोलीस पथक घटनास्थळी आले. पोलिसांनी धीरज पाटील यांना रुग्णालयात नेले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केली आणि धीर पाटील यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. कोल्हापूरमध्ये झालेल्या या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओतून अपघाताच्या तीव्रतेचा अंदाज येतो.
Comments
Add Comment

Special Trains :नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून धावणार विशेष गाड्या

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५

पुण्यात डिजिटल अरेस्टची धमकी देत, ज्येष्ठ नागरिकाची कोटींची फसवणूक

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधींचा

नाशिक महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग; भाजपमधील तीन प्रभावी चेहरे चर्चेत

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीनंतर नाशिकच्या सत्तावर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्पष्ट संख्याबळासह

Amrit Bharat Express Train Routes : मुंबईकरांची चांदी! 'अमृत भारत एक्सप्रेस'ने लांब पल्ल्याचा प्रवास होणार स्वस्त; जाणून घ्या कुठे-कुठे थांबणार गाडी?

मुंबई : भारतीय रेल्वेने सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी सुरू केलेल्या 'अमृत भारत एक्सप्रेस' ताफ्यात आता आणखी ९

Ashish Jaiswal : आमदार आशिष जयस्वाल यांच्या पाठपुराव्याला यश; प्रकल्पबाधित तरुण दिनेश हावरे यांचा पोलीस सेवेतील मार्ग मोकळा!

सातारा : नियम आणि प्रशासकीय तांत्रिकतेच्या कचाट्यात अडकलेल्या एका होतकरू तरुणाच्या आयुष्यात अखेर आशेचा नवा

महापालिकेच्या अर्थसंकल्पाची औपचारिकता पूर्ण होणार

स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर आयुक्त मांडणार अर्थसंकल्प मुंबई : मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा