Kolhapur Accident : कोल्हापूरमधील धक्कादायक घटना, धावत्या गाडीत हॉर्ट अॅटॅक

कोल्हापूर : टेंबलाई नाका चौकातून टाकाळा मार्गे राजारामपुरीकडे जाणार्‍या उड्डाणपुलाजवळ भरधाव कारने रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या दुचाकी, रिक्षांसह नऊ वाहनांना उडवले. या दुर्घटनेत राजारामपुरी येथील धीरज शिवाजीराव पाटील या ५५ वर्षांच्या उद्योजकाचा मृत्यू झाला. ते राजारामपुरीतील पाचव्या गल्लीत वास्तव्यास होते. कार चालवत असतानाच धीरज पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि हा अपघात घडला, अशी शक्यता पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती व्यक्त केली आहे.







कोल्हापूर शहरातील टेंबलाई नाका चौकातून टाकाळा मार्गे राजारामपुरीकडे जाणार्‍या उड्डाणपुलाजवळ धीरज शिवाजीराव पाटील हे त्यांच्या कारमधून जात होते. ते ताराबाई पार्क परिसरातील हॉटेलमध्ये जेवण करून मध्यरात्री दोनच्या सुमारास टेंबलाई नाका, टाकाळामार्गे राजारामपुरी येथील आपल्या निवासस्थानाकडे कारने जात होते. यावेळी अचानक त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि भरधाव वेगात असलेली त्यांची कार उड्डाणपुलाजवळ रस्त्याच्या एका बाजूला रिक्षा, मोपेड, दुचाकीसह एकूण नऊ वाहनांना धडक देऊन पुढे गेली. कार पुढे जाऊन रस्त्यावर कचरा कोंडाळ्याजवळ जाऊन थांबली.





मध्यरात्र असल्याने या अपघातवेळी मोठा आवाज झाला. आवाज ऐकून घाबरलेले नागरिक पटकन रस्त्यावर आले. यावेळी रस्त्यावर तुटलेल्या वाहनांचा खच पडला होता. शिवाय, एक कार पुढे कचऱ्याजवळ जाऊन थांबलेली दिसली. हे बघून नागरिकांनी पोलिसांना बोलावले. पोलीस पथक घटनास्थळी आले. पोलिसांनी धीरज पाटील यांना रुग्णालयात नेले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केली आणि धीर पाटील यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. कोल्हापूरमध्ये झालेल्या या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओतून अपघाताच्या तीव्रतेचा अंदाज येतो.
Comments
Add Comment

संगमनेर येथील 'पोकळी हिस्से' नोंदीचा प्रश्न मार्गी

नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील इंदिरा नगर भागात सर्वे

पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांविरोधात मोठी कारवाई

पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात १९ मे २०२४ रोजी पोर्शे कारचा अपघात झाला होता. पोर्शे कारने अश्विनी कोस्टा आणि

नाशिक - पुणे रेल्वे मार्गात बदल, अहिल्यानगरचे नागरिक नाराज

नागपूर : कित्येक वर्षांपासून बहुचर्चित नाशिक - पुणे लोहमार्ग होण्याच्या दिशेने गंभीरपणे हालचाली सुरू झाल्या

दीपावलीला युनेस्कोचा दर्जा; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात केले निवेदन

नागपूर : युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा जगभर

महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा गंभीर प्रश्न; नागपूर अधिवेशनात आमदार सोनवणे यांनी वेधले लक्ष, 'राज्य आपत्ती' घोषित करण्याची मागणी

नागपूर : महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या मानवी वस्तीत घुसून होणाऱ्या जीवघेण्या

बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा

नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत