WPLमध्ये मुंबई इंडियन्सचीच हवा, मिळवले दुसरे जेतेपद, दिल्लीचे स्वप्न भंग

मुंबई: मुंबई इंडियन्सने शानदार कामगिरी करताना महिला प्रीमियर लीग २०२५ जिंकली आहे. १५ मार्च शनिवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ८ धावांनी पराभव केला. फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी १५० धावांचे आव्हान दिले होते. मात्र त्यांना ९ बाद १४१ धावाच करता आल्या.


हरमनप्रीतच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा विमेन प्रीमियर लीगचा खिताब जिंकला आहे. याआधी त्यांनी WPLचा पहिला खिताबही जिंकला होता. हा २०२३मध्ये आयोजित करण्यात आला होता. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाला सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये पराभवास सामोरे जावे लागले. WPLचा दुसरा हंगाम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला हरवत आपल्या नावे केला होता.


फायनल सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचे ठराविक अंतराने विकेट पडत होते. एकवेळेस दिल्लीची धावसंख्या ६ बाद ८३ झाली होती. ते मोठ्या पराभवाच्या दिशेने जात होते. मात्र दक्षिण आफ्रिकेची ऑलराऊंडर मारिजाने कॅपने तुफानी खेळी करत सामना रोमहर्षक वळणावर ठेवला. दरम्यान, १८व्या शतकांत नेट सायवर ब्राँट नेक कॅपला बाद केले आण दिल्लीच्या आशा मावळल्या.


मुंबईकडून नेट सायबवर ब्रँटने सर्वाधिक तीन विकेट मिळवल्या. तर एमोलिया केरला दोन बळी मिळवता आले.

Comments
Add Comment

टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात संथ अर्धशतक

पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या साखळी सामन्यात श्रीलंकेने ओमानचा

ओमानविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा विजय, पवन रथनायके सामनावीर

पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या साखळी सामन्यात श्रीलंकेने ओमानचा

T20 World Cup 2026: 'या' खेळाडूला अंपायरशी वाद घालणं पडलं महागात

श्रीलंका: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पंचांच्या निर्णयाचे उल्लंघन केल्याबद्दल अफगाणिस्तानचा अनुभवी

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या