WPLमध्ये मुंबई इंडियन्सचीच हवा, मिळवले दुसरे जेतेपद, दिल्लीचे स्वप्न भंग

  75

मुंबई: मुंबई इंडियन्सने शानदार कामगिरी करताना महिला प्रीमियर लीग २०२५ जिंकली आहे. १५ मार्च शनिवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ८ धावांनी पराभव केला. फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी १५० धावांचे आव्हान दिले होते. मात्र त्यांना ९ बाद १४१ धावाच करता आल्या.


हरमनप्रीतच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा विमेन प्रीमियर लीगचा खिताब जिंकला आहे. याआधी त्यांनी WPLचा पहिला खिताबही जिंकला होता. हा २०२३मध्ये आयोजित करण्यात आला होता. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाला सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये पराभवास सामोरे जावे लागले. WPLचा दुसरा हंगाम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला हरवत आपल्या नावे केला होता.


फायनल सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचे ठराविक अंतराने विकेट पडत होते. एकवेळेस दिल्लीची धावसंख्या ६ बाद ८३ झाली होती. ते मोठ्या पराभवाच्या दिशेने जात होते. मात्र दक्षिण आफ्रिकेची ऑलराऊंडर मारिजाने कॅपने तुफानी खेळी करत सामना रोमहर्षक वळणावर ठेवला. दरम्यान, १८व्या शतकांत नेट सायवर ब्राँट नेक कॅपला बाद केले आण दिल्लीच्या आशा मावळल्या.


मुंबईकडून नेट सायबवर ब्रँटने सर्वाधिक तीन विकेट मिळवल्या. तर एमोलिया केरला दोन बळी मिळवता आले.

Comments
Add Comment

IND vs ENG: पावसामुळे खेळ थांबला, इंग्लंड विजयापासून ३५ धावा दूर तर भारताला हव्यात ४ विकेट

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर खेळवला जात आहे. आज सामन्याचा चौथा दिवस

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र