Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर चाकरमान्यांचा खोळंबा, प्रचंड वाहतूककोंडी!

मुंबई : होळी आणि धूलिवंदनाचा (Holi 2025) सण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. अनेक चाकरमानी होळी साजरी करण्यासाठी गावी देखील गेले होते. दरम्यान आता शिमगा संपला असून चाकरमान्यांनी मुंबईची वाट धरली आहे. मात्र या चाकरमान्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. (Mumbai Goa Highway)



मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) माणगाव आणि इंदापूरजवळ अभूतपूर्व वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली आहे. याचा फटका मुंबई आणि परिसरातून कोकणात निघालेल्या शेकडो कुटुंबीयांना बसला आहे. दुसरीकडे, कोकणातून मुंबई आणि उपनगरांच्या दिशेने येणारी वाहनेही दुसऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडीत अडकली आहेत. वाहनांची जवळपास सहा ते सात किलोमीटरपर्यंत रांग लागली आहे असून कासवगतीने वाहने पुढे सरकत आहेत. भरउन्हात वाहतूक कोंडीतून वाट काढताना कारचालकांना कसरत करावी लागत आहे.


दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने ही वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर होळीसह शनिवार रविवार जोडून आल्याने विकेंड घालवण्यासाठी कोकणात, मुंबईस व पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. यामुळे सध्या वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात असून, वाहनचालकांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

Ashok Kharat Case : धर्माच्या आड काळे कारनामे! ‘भोंदू’ अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

मुंबई : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला अशोक खरात (Ashok

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

Nashik Simhastha Kumbh Mela : 'कुंभमेळा कामांना अधिक गती देणार'

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी

River Linking : 'नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार'

नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या

E-KYC Mandatory for Teachers : शिक्षकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; मे महिन्याच्या वेतनावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई : राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिलेल्या आदेशानुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व