Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर चाकरमान्यांचा खोळंबा, प्रचंड वाहतूककोंडी!

मुंबई : होळी आणि धूलिवंदनाचा (Holi 2025) सण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. अनेक चाकरमानी होळी साजरी करण्यासाठी गावी देखील गेले होते. दरम्यान आता शिमगा संपला असून चाकरमान्यांनी मुंबईची वाट धरली आहे. मात्र या चाकरमान्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. (Mumbai Goa Highway)



मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) माणगाव आणि इंदापूरजवळ अभूतपूर्व वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली आहे. याचा फटका मुंबई आणि परिसरातून कोकणात निघालेल्या शेकडो कुटुंबीयांना बसला आहे. दुसरीकडे, कोकणातून मुंबई आणि उपनगरांच्या दिशेने येणारी वाहनेही दुसऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडीत अडकली आहेत. वाहनांची जवळपास सहा ते सात किलोमीटरपर्यंत रांग लागली आहे असून कासवगतीने वाहने पुढे सरकत आहेत. भरउन्हात वाहतूक कोंडीतून वाट काढताना कारचालकांना कसरत करावी लागत आहे.


दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने ही वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर होळीसह शनिवार रविवार जोडून आल्याने विकेंड घालवण्यासाठी कोकणात, मुंबईस व पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. यामुळे सध्या वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात असून, वाहनचालकांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Ashadhi Wari 2026 : आषाढी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर; पुण्यात २ दिवस रंगणार भक्तीचा महोत्सव

पुणे : आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलभक्तीच्या रंगात रंगला आहे. संत ज्ञानेश्वर

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! रविवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरींचा अंदाज; २५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात रविवारचा दिवस पावसाळी ठरण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील २५

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता