Ranbir Kapoor : आलियाचा वाढदिवस सोडून रणबीर मैत्रीला जागला

मुंबई : बॉलीवूडची आदर्श जोडी म्हणून आलिया आणि रणबीर कपूरकडे (Ranbir Kapoor) बघितलं जात. या जोडीने पुन्हा एकदा चाहत्यांसमोर आदर्श उभा केला आहे. पत्नी आलियाचा वाढदिवस असतानाही रणबीरने मैत्रीचं नातं जपण्याला प्राधान्य दिलं. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीचे वडील देब मुखर्जी यांनी वयाच्या ८३व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलिया आणि रणबीर जोडीने हजर राहिल्याचं पाहायला मिळालं.



आलियाचा आज (१५ मार्च ) वाढदिवस आहे. (Alia Birthday) मात्र आलिया आणि रणबीरने वाढदिवसाचं प्री सेलिब्रेशन १३ मार्च ला माध्यमांसोबत अलिबाग येथे केले. त्यानंतर रणबीरला अयान मुखर्जीच्या वडिलांची निधनाची बातमी समजल्यानंतर त्याने तडक मुंबई गाठली. अयान मुखर्जीच्या वडीलांचे निधन १४ मार्चला झाले. मुंबईला येताच रणबीर आणि आलिया अयान मुखर्जीच्या घरी गेले. तेव्हा अयानच्या घरी त्याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येणाऱ्या कलाकारांना रणबीर भेटताना दिसला. बॉलिवूडचे अनेक कलाकार अयान मुखर्जीच्या घरी आले होते. यात करण जोहर, जया बच्चन, सलीम खान अशा अनेक सेलिब्रिटींचा समावेश होता.(Alia Birthday)


अयान सोबत रणबीरने देब मुखर्जी यांच्या पार्थिवाला खांदा दिल्याचे फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहेत. दरम्यान बायकोचा वाढदिवस असतानाही रणबीरने मैत्रीला प्राधान्य दिले. रणबीरच्या या कृतीवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास