महिलेच्या हत्येचे गूढ उकलले

विरार(प्रतिनिधी): मांडवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत होळीच्या दिवशी महिलेचे छाटलेले मुंडके सापडल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी २४ तासात उलगडा केला असून कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे अविनाश अंबुरे यांनी दिली आहे.



विरारच्या मांडवी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या विरार फाटा परिसरामध्ये महिलेचे छाटलेले मुंडके असलेली सुटकेस काही लोकांना गुरुवारी दिसून आली. याबाबत त्यांनी मांडवी पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळावरून महिलेचे छाटलेले मुंडके ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला. मुंडके असलेल्या सुटकेस मध्येच सराफा दुकानाचे नाव असलेले पाकीट पोलिसांना मिळाले. या पाकिटापासून सुरू झालेला तपास आरोपीला शोधण्यापर्यंत पोहचला.



नालासोपारा मधील रहमत नगर राहणाऱ्या हरीश हिप्परगी यानेच आपली पत्नी उत्पला दास हिची ८ जानेवारी रोजी गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पत्नीचा गळा आणि धड वेगळे केले. छाटलेले मुंडके मुंबई अहमदाबाद मार्गावर सुटकेस मध्ये टाकून फेकले तर धड प्रगती नगर मधील नाल्यात फेकल्याची कबुली आरोपीने दिली आहे. सदर महिला ही पश्चिम बंगाल मधील असून, आपल्या मुलांसोबत ती पश्चिम बंगालमध्ये राहण्यासाठी जाणार होती, यावरुनच पती -पत्नी मध्ये खटके उडत होते. याच रागातून पतीने पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे