न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक अपहार प्रकरणील आरोपीस गुजरातमधून अटक

  46

मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटींच्या अपहार प्रकरणातील आरोपी कपिल देढियाला आर्थिक गुन्हे शाखेने गुजरातमधून अटक केली. गैरव्यवहारातील १२ कोटी रुपये आरोपीच्या खात्यात जमा झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आरोपीला शनिवारी न्यायलयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ही याप्रकरणातील पाचवी अटक आहे.



न्यू इंडिया को – ऑपरेटिव्ह बँकेतील अपहारातील रक्कम कपिल देढिया याच्या बँक खात्यात जमा झाली होती. त्याला अटक करण्यात आली. वडोदरा येथे शोधमोहिम राबवून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला शनिवारी मुंबईत आणण्यात आले आणि सकाळी ११.३० वाजता औपचारिकपणे अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायलायने आरोपीला १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.



तपासानुसार, त्याच्या खात्यात अपहारातील १२ कोटी जमा करण्यात आले होते. याप्रकरणातील आरोपी मनोहर अरूणाचलम याच्या अटकेनंतर देढिया गायब झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी तीन पथके राजस्थान व गुजरातमध्ये पाठवण्यात आली होती. अखेर पोलिसांनी त्याला वडोदरा येथे ताब्यात घेतले. आतापर्यंत या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात बँकेचे महाव्यवस्थापक हितेश मेहता, बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन, बँकेचे सीईओ अभिमन्यू भोअन, मनोहर उन्ननाथन यांचा समावेश आहे.याशिवाय याप्रकरणात हिरेन भानू, गौरी भानू, उन्ननाथन अरूणाचलमसह देढियालाही आरोपी करण्यात आले आहे. या चौघांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आल्या होत्या. भानू दाम्पत्याने अपहारातील सुमारे २८ कोटी प्राप्त केल्याचा संशय असून ते विदेशात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी महाव्यवस्थापक हितेश मेहताच्या मालमत्तांची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. तपासाअंती त्यांच्यावर टाच आणण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.