न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक अपहार प्रकरणील आरोपीस गुजरातमधून अटक

मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटींच्या अपहार प्रकरणातील आरोपी कपिल देढियाला आर्थिक गुन्हे शाखेने गुजरातमधून अटक केली. गैरव्यवहारातील १२ कोटी रुपये आरोपीच्या खात्यात जमा झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आरोपीला शनिवारी न्यायलयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ही याप्रकरणातील पाचवी अटक आहे.



न्यू इंडिया को – ऑपरेटिव्ह बँकेतील अपहारातील रक्कम कपिल देढिया याच्या बँक खात्यात जमा झाली होती. त्याला अटक करण्यात आली. वडोदरा येथे शोधमोहिम राबवून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला शनिवारी मुंबईत आणण्यात आले आणि सकाळी ११.३० वाजता औपचारिकपणे अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायलायने आरोपीला १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.



तपासानुसार, त्याच्या खात्यात अपहारातील १२ कोटी जमा करण्यात आले होते. याप्रकरणातील आरोपी मनोहर अरूणाचलम याच्या अटकेनंतर देढिया गायब झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी तीन पथके राजस्थान व गुजरातमध्ये पाठवण्यात आली होती. अखेर पोलिसांनी त्याला वडोदरा येथे ताब्यात घेतले. आतापर्यंत या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात बँकेचे महाव्यवस्थापक हितेश मेहता, बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन, बँकेचे सीईओ अभिमन्यू भोअन, मनोहर उन्ननाथन यांचा समावेश आहे.याशिवाय याप्रकरणात हिरेन भानू, गौरी भानू, उन्ननाथन अरूणाचलमसह देढियालाही आरोपी करण्यात आले आहे. या चौघांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आल्या होत्या. भानू दाम्पत्याने अपहारातील सुमारे २८ कोटी प्राप्त केल्याचा संशय असून ते विदेशात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी महाव्यवस्थापक हितेश मेहताच्या मालमत्तांची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. तपासाअंती त्यांच्यावर टाच आणण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
Comments
Add Comment

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,

मुबंईत येत्या मंगळवारपासून तीन दिवस १० टक्के पाणीकपात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्हॅट

भायखळा-सायन स्थानकांदरम्यान पायाभूत कामांसाठी ब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : सायन (शीव) आणि भायखळा अशा दोन रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलाच्या कामांसाठी मध्य रेल्वेकडून