वारकऱ्यांना इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास मनाई

पुणे (प्रतिनिधी): तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांसाठी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. १४ ते १६ मार्च दरम्यान होणाऱ्या या पवित्र सोहळ्यात हजारो वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करतात आणि हेच पाणी पवित्र मानून ग्रहण करतात. मात्र, यंदा नदीतील पाणी पिण्यास तसेच स्वयंपाकासाठी वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.



वारकऱ्यांची मोठी गर्दी आणि नदीतील पाण्याची गुणवत्ता लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरांवरील पाणी पिण्यास अथवा स्वयंपाकासाठी वापरण्यास योग्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नदीतील पाणी दूषित होण्याची शक्यता असल्याने हे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, वारकऱ्यांनी इंद्रायणीचे पाणी केवळ स्नान, भांडी धुणे किंवा इतर आवश्यक गोष्टींसाठी वापरावे. मात्र, पिण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या नळांचे पाणीच वापरावे.



नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई

इंद्रायणी नदीच्या पाण्याचा उपयोग करताना कोणत्याही प्रकारे ते दूषित होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः, नदीमध्ये कपडे धुणे किंवा अन्य दूषित करणारी कृती करू नये, असे आदेश दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.



दूषित पाण्यामुळे साथीच्या आजाराचा धोका

वारकरी संप्रदायासाठी तुकाराम बीज हा अत्यंत श्रद्धेचा आणि भक्तीचा सोहळा आहे. हजारो भाविक या ठिकाणी येत असल्याने त्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची जबाबदारी प्रशासनावर आहे. नदीचे पाणी दूषित झाल्यास साथीच्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच, हा निर्णय घेण्यात आला आहे.



वारकऱ्यांच्या आरोग्यावर भर देण्याचा निर्णय

वारकऱ्यांनी प्रशासनाच्या आदेशांचे पालन करणे गरजेचे आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि वारकऱ्यांचे आरोग्य यावर भर देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासन आणि वारकरी संप्रदायाच्या समन्वयाने हा सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे