Virar : विरारमध्ये खळबळ! सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं; इतर अवयव गायब

मुंबई : विरारमध्ये (Virar Crime)एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार फाट्याजवळील पिरकुंडा दर्ग्याजवळ एका सुटकेसमध्ये धड नसलेले महिलेचं मुंडकं आढळलं आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरारच्या शिरवली गावाजवळ ही घटना घडली. गुरूवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. गुरूवारी संध्याकाळी काही तरूणांचा ग्रुप मांडवी जवळील शिरवली गावात येथे जात होता. तेथे या तरूणांना एक सुटकेस दिसली. तरुणांनी सुटकेस उघडताच त्यामध्ये महिलेचं मुंडकं आढळलं. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यांनी त्वरित ही बाब स्थानिक मांडवी पोलिसांना कळवली.



दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक तपासानुसार, सदर महिला पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तिच्या शरीराचे इतर अवयव कुठे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचबरोबर, कलिना येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी अधिकचा तपास केला. आता मुख्य आरोपी नक्की कोण आहे, याचाही पोलीस तपास घेत आहेत.
Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात