Virar : विरारमध्ये खळबळ! सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं; इतर अवयव गायब

मुंबई : विरारमध्ये (Virar Crime)एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार फाट्याजवळील पिरकुंडा दर्ग्याजवळ एका सुटकेसमध्ये धड नसलेले महिलेचं मुंडकं आढळलं आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरारच्या शिरवली गावाजवळ ही घटना घडली. गुरूवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. गुरूवारी संध्याकाळी काही तरूणांचा ग्रुप मांडवी जवळील शिरवली गावात येथे जात होता. तेथे या तरूणांना एक सुटकेस दिसली. तरुणांनी सुटकेस उघडताच त्यामध्ये महिलेचं मुंडकं आढळलं. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यांनी त्वरित ही बाब स्थानिक मांडवी पोलिसांना कळवली.



दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक तपासानुसार, सदर महिला पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तिच्या शरीराचे इतर अवयव कुठे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचबरोबर, कलिना येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी अधिकचा तपास केला. आता मुख्य आरोपी नक्की कोण आहे, याचाही पोलीस तपास घेत आहेत.
Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.