Virar : विरारमध्ये खळबळ! सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं; इतर अवयव गायब

मुंबई : विरारमध्ये (Virar Crime)एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार फाट्याजवळील पिरकुंडा दर्ग्याजवळ एका सुटकेसमध्ये धड नसलेले महिलेचं मुंडकं आढळलं आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरारच्या शिरवली गावाजवळ ही घटना घडली. गुरूवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. गुरूवारी संध्याकाळी काही तरूणांचा ग्रुप मांडवी जवळील शिरवली गावात येथे जात होता. तेथे या तरूणांना एक सुटकेस दिसली. तरुणांनी सुटकेस उघडताच त्यामध्ये महिलेचं मुंडकं आढळलं. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यांनी त्वरित ही बाब स्थानिक मांडवी पोलिसांना कळवली.



दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक तपासानुसार, सदर महिला पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तिच्या शरीराचे इतर अवयव कुठे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचबरोबर, कलिना येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी अधिकचा तपास केला. आता मुख्य आरोपी नक्की कोण आहे, याचाही पोलीस तपास घेत आहेत.
Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत