पुण्यात १५ मार्चपासून दूध महागणार

पुणे : पुणे जिल्ह्यात शनिवार १५ मार्च २०२५ पासून दूध महागणार आहे. सध्या ५६ रुपये लिटर दराने मिळणारे गायीचे दूध आता ५८ रुपये लिटर दराने मिळणार आहे. तसेच सध्या ७२ रुपये लिटर दराने मिळणारे म्हशीचे दूध आता ७४ रुपये लिटर दराने मिळणार आहे.



बुधवार १२ मार्च रोजी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक सोसायटी येथे झालेल्या दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघटनेच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. या बैठकीत विविध सहकारी आणि खाजगी दूध संघांचे ४७ प्रतिनिधी उपस्थित होते. वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचा विचार करून दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.



पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक सोसायटी म्हणजे कात्रज डेअरी येथे झालेल्या दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघटनेच्या बैठकीत दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय एकमताने झाला. संघटनेचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मानद सचिव प्रकाश कुटवाल, संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, दुग्ध उद्योग तज्ज्ञ श्रीपाद चितळे आणि पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष स्वप्नील धामढेरे उपस्थित होते.

बैठकीत दूध आणि पनीर भेसळीबाबतही चर्चा झाली. या समस्येवर मात करण्यासाठी जनजागृती मोहिमांचे महत्त्व सदस्यांनी अधोरेखित केले आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना प्रलंबित अनुदाने जलदगतीने मिळावीत यासाठी सरकारशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. भेसळीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन तसेच दुग्धविकास मंत्री यांची भेट घेण्याबाबत चर्चा झाली. बनावट पनीरच्या मुद्याकडे अलिकडेच भाजपा आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी लक्ष वेधले होते. सध्या विक्री होत असलेल्या पनीरपैकी ६० ते ७० टक्के पनीर बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हा आरोप करताना त्यांनी सभागृहात बनावट पनीर दाखवले होते. राज्य सरकारने बनावट पनीर तयार करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
Comments
Add Comment

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे