Jay Pawar Wedding : पवारांच्या घरात वाजणार सनई चौघडे, लवकरच होणार नव्या सुनेचे आगमन

मुंबई : एकीकडे जगभरात होळीचे रंग विखुरलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी सनई चौघड्यांचा सूर दुमदुमणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar ) यांचे धाकटे चिरंजीव लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे. जय पवारांच्या आत्याबाई आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule ) यांनी भाच्याचे आणि होणाऱ्या सुनेचे फोटो सोशल माध्यमांवर पोस्ट केले आहेत.



जय पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत. जय पवार सक्रिय राजकारणात नसले, तरीही राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर स्थानिक पातळीवर राजकारणात त्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता जय पवार लग्नामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव ऋतुजा पाटील आहे. लवकरच या दोघांची लग्नगाठ बांधण्यात येणार असून पवार कुटुंबात सनई चौघडे वाजू लागले आहेत. दरम्यान या लग्नाचे पडसाद राजकीय कारकिर्दीवर पडतील का ? हे पाहणे महत्त्वाचं ठरेल



कोण आहे जय पवार यांची पत्नी ?


सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील (rutuja patil) यांच्यासोबत अजित पवारांचे पुत्र जय यांचा विवाह होणार आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. आता त्यांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला आहे. ऋतुजा पाटील यांची बहीण ही केसरी टूर्सच्या पाटील कुटुंबाची सून आहेत.

Comments
Add Comment

BMC : गोकुळधाममध्ये पीपीपी तत्वावर दिलेल्या प्रसुतीगृहाच्या जागेत चालते शाळा

नगरसेविका प्रिती सातम यांनी केला संस्थेच्या कामांचा पुराव्यांसह पर्दाफाश चौकशी करून कारवाई करण्याचे

BMC News : आता तांत्रिक पाणीकपात टाळणार, महापालिकेची वतीने घेतली जाते खबरदारी

भांडुप संकुलातील विद्युत उपक्रेंद्राच्याठिकाणी उभारणार अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर मुंबई : मुंबईत (Mumbai) सध्या

Mumbai Rain : पावसामुळे अंधेरी सबवे बंद, शहरातील अनेक भाग जलमय; वाहतूक विस्कळीत

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली असून शहरातील अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी

Poison Capsule Case: विषारी कॅप्सूल वाटप प्रकरणात सायको किलरचा मास्टरप्लॅन; AI ला विचारले नको ते प्रश्न 

मुंबई: मुंबईतील (Mumbai) मोहरम मिरवणुकीदरम्यान विषारी कॅप्सूल वाटप (Poison Capsule Case) करण्याच्या संशयित कटाचा मुंबई

लोकल प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा निर्णय; स्थानकांवर बॅगांची होणार तपासणी

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेत प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांनी

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत