Jay Pawar Wedding : पवारांच्या घरात वाजणार सनई चौघडे, लवकरच होणार नव्या सुनेचे आगमन

मुंबई : एकीकडे जगभरात होळीचे रंग विखुरलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी सनई चौघड्यांचा सूर दुमदुमणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar ) यांचे धाकटे चिरंजीव लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे. जय पवारांच्या आत्याबाई आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule ) यांनी भाच्याचे आणि होणाऱ्या सुनेचे फोटो सोशल माध्यमांवर पोस्ट केले आहेत.



जय पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत. जय पवार सक्रिय राजकारणात नसले, तरीही राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर स्थानिक पातळीवर राजकारणात त्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता जय पवार लग्नामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव ऋतुजा पाटील आहे. लवकरच या दोघांची लग्नगाठ बांधण्यात येणार असून पवार कुटुंबात सनई चौघडे वाजू लागले आहेत. दरम्यान या लग्नाचे पडसाद राजकीय कारकिर्दीवर पडतील का ? हे पाहणे महत्त्वाचं ठरेल



कोण आहे जय पवार यांची पत्नी ?


सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील (rutuja patil) यांच्यासोबत अजित पवारांचे पुत्र जय यांचा विवाह होणार आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. आता त्यांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला आहे. ऋतुजा पाटील यांची बहीण ही केसरी टूर्सच्या पाटील कुटुंबाची सून आहेत.

Comments
Add Comment

गेटवे परिसरातील डिझेल बोटी होणार इलेक्ट्रिक; हरित आणि इंधन बचतीसाठी राज्य सरकारचा पुढाकार

इलेक्ट्रिक बोटींसाठी मुंबई बँकेने विशेष कर्ज योजना आणावी - मंत्री नितेश राणे इलेक्ट्रिक बोटिंसाठी मुंबई बँक

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Water Shortage : राज्यातील १५ जिल्ह्यांत पाणीटंचाई

६३३ गावे, १ हजार ६५२ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू मुंबई : राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे

महाराष्ट्रात होणार २५ हजार ४०० मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती

६ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक; १ लाख २३ हजार ५०० नोकऱ्या उपलब्ध होणार मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

ॲमिटी विद्यापीठाला पनवेलमध्ये १५ एकर जमीन; मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : ॲमिटी विद्यापीठाची मूळ संस्था असलेल्या रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेला मौजे भाताण

Tushar Gaikwad : खासदार वर्षा गायकवाड यांचे बंधू तुषार गायकवाड यांचे निधन

मुंबई : उत्तर-मध्य मुंबईच्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे धाकटे बंधू तुषार एकनाथ गायकवाड (Tushar Gaikwad) यांचे