Chandrashekhar Bawankule : संजय राऊतांनी रोज सकाळचा शिमगा बंद करावा!

चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला


मुंबई : राज्यभरात होळी आणि धूलिवंदनाचा सण (Holi 2025) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सर्वसामान्यांसह दिव्यंग तसेच अनेक राजकीय नेते देखील कुटुंबासह धुळवडीचा आनंद घेत आहेत. अशातच राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी धुळवडीच्या शुभेच्या देत संजय राऊतांना (Sanjay Raut) टोला लगावला आहे.



महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज (१४ फेब्रुवारी) सकाळी सात वाजल्यापासून आपल्या कार्यकर्त्यांसोबत धुळवडीचा उत्सव साजरा करत आहेत. मतभेद विसरुन एकत्र येण्याचा होळी हा सण असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी संजय राऊतांना शुभेच्छा देत, रोज सकाळी ९ वाजताचा शिमगा त्यांनी बंद करावा आणि महाराष्ट्राच्या विकासाकरिता सुचना कराव्यात असा टोला लगावला. 'संजय राऊत (Sanjay Raut) रोज सकाळी ९ वाजता जो शिमगा साजरा करतात तो बंद करुन, महाराष्ट्राच्या हितासाठी सुचना कराव्यात. वर्षभर शिमगा साजरा करता. आज होळीच्या दिवशी तो शिमगा न करता मुख्यमंत्री देवेंद्रजींना, आम्हा सगळ्यांना विकासाकरिता सुचना द्याव्यात. राऊतांनी रोज सकाळी बोलावं पण, महाराष्ट्राच्या हिताकरिता यथार्थ बोलावं' असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बोलताना म्हटले.


त्याचबरोबर " उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) रोज सभागृहात यावं आणि महाराष्ट्र कसा पुढे नेता येईल याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कराव. अडीच वर्षात त्यांनी काय काय केलं हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे त्यांनी सभागृहात कधी कधी न येता रोजच सभागृहात यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं" असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ahilyanagar : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला अटक; दोन गावे कडकडीत बंद

Ahilyanagar ( राहुरी /आश्वी प्रतिनिधी ) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यात तुळापूर (Tulapur) येथील एक संतापजनक घटना