Chandrashekhar Bawankule : संजय राऊतांनी रोज सकाळचा शिमगा बंद करावा!

  59

चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला


मुंबई : राज्यभरात होळी आणि धूलिवंदनाचा सण (Holi 2025) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सर्वसामान्यांसह दिव्यंग तसेच अनेक राजकीय नेते देखील कुटुंबासह धुळवडीचा आनंद घेत आहेत. अशातच राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी धुळवडीच्या शुभेच्या देत संजय राऊतांना (Sanjay Raut) टोला लगावला आहे.



महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज (१४ फेब्रुवारी) सकाळी सात वाजल्यापासून आपल्या कार्यकर्त्यांसोबत धुळवडीचा उत्सव साजरा करत आहेत. मतभेद विसरुन एकत्र येण्याचा होळी हा सण असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी संजय राऊतांना शुभेच्छा देत, रोज सकाळी ९ वाजताचा शिमगा त्यांनी बंद करावा आणि महाराष्ट्राच्या विकासाकरिता सुचना कराव्यात असा टोला लगावला. 'संजय राऊत (Sanjay Raut) रोज सकाळी ९ वाजता जो शिमगा साजरा करतात तो बंद करुन, महाराष्ट्राच्या हितासाठी सुचना कराव्यात. वर्षभर शिमगा साजरा करता. आज होळीच्या दिवशी तो शिमगा न करता मुख्यमंत्री देवेंद्रजींना, आम्हा सगळ्यांना विकासाकरिता सुचना द्याव्यात. राऊतांनी रोज सकाळी बोलावं पण, महाराष्ट्राच्या हिताकरिता यथार्थ बोलावं' असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बोलताना म्हटले.


त्याचबरोबर " उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) रोज सभागृहात यावं आणि महाराष्ट्र कसा पुढे नेता येईल याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कराव. अडीच वर्षात त्यांनी काय काय केलं हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे त्यांनी सभागृहात कधी कधी न येता रोजच सभागृहात यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं" असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

Stock Market Update: सेन्सेक्स २६.६७ व ३७.०५ अंकाने वाढला ! सकारात्मक सुरुवात तेजीचे संकेत?

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज किरकोळ वाढच अपेक्षित आहे. प्रामुख्याने सकाळी गिफ्ट निफ्टीत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे, परराष्ट्र मंत्र्यांकडे आ. निलेश राणे यांची मागणी

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी

सासरचा मान घटस्फोटापर्यंत मिळणे हा प्रत्येक पत्नीचा अधिकार, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा

मुंबई (प्रतिनिधी) : पत्नी जर सासरी ऐशारामात राहिली असली तरी तिला तशाच प्रकारचे राहणीमान सासर सोडल्यानंतर

आषाढीनिमित्त मध्य रेल्वे तीन एकेरी विशेष गाड्या चालवणार

मुंबई (प्रतिनिधी): पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी मध्य

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

आपल्या भाषा भारताला एकजूट करण्यासाठी सशक्त पर्याय बनतील - अमित शाह

हिंदी सर्व भारतीय भाषांची सखी! नवी दिल्ली : हिंदी भाषा कुठल्याही भारतीय भाषेची शत्रू नाही. हिंदी सर्व भारतीय