चेन्नई : तामीळनाडू आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेला तामीळ विरुद्ध हिंदी हा भाषावाद आणखी तीव्र झाला आहे. तामीळनाडूत द्रमुक (इंडी आघाडी) सत्तेत आहे तर केंद्रात भाजपाच्या (एनडीए) नेतृत्वातले सरकार आहे. द्रमुक सरकारने भाषावादात स्वतःची भूमिका आणखी कठोर केली आहे. तामीळनाडूतील स्टॅलिन सरकारने राज्याच्या शुक्रवारी १४ मार्च रोजी जाहीर होणार असलेल्या २०२५ – २६ च्या अर्थसंकल्पातून ‘₹’ चिन्ह काढून टाकले आणि त्याऐवजी ‘ரூ’ हे चिन्ह वापरले आहे.
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात त्रिभाषिक सूत्राद्वारे राज्यावर हिंदी लादल्याच्या आरोप करणाऱ्या तामीळनाडूतील द्रमुक सरकारने रुपयाचे चिन्ह बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तामीळनाडू हे देशातील पहिले राज्य झाले आहे जिथे रुपयाचे चिन्ह बदलण्यात आले आहे. स्टॅलिन सरकारने अद्याप अर्थसंकल्पातील बदल या विषयावर अधिकृत भाष्य केलेले नाही. पण भाजपाने तामीळनाडू सरकारच्या कृतीवर टीका केली आहे. द्रमुकच्या नेतृत्वातील तामीळनाडू सरकारची कृती ही भारतापासून वेगळे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाने दिली. भाषावाद निर्माण करुन द्रमुक स्वतःच्या अपयशांकडून सर्वांचे लक्ष दुसरीकडे वेधू इच्छिते, अशीही शक्यता भाजपाने व्यक्त केली. तर तामीळ भाषेला प्राधान्य देण्यासाठी अर्थसंकल्पातून ‘₹’ चिन्ह काढून टाकले आणि त्याऐवजी ‘ரூ’ हे चिन्ह वापरले आहे, असे द्रमुकचे नेते सरवनन अन्नादुराई म्हणाले. त्यांनी तामीळनाडू सरकारच्या कृतीत काहीही बेकायदा नसल्याचा दावा केला.
तामीळनाडूत २०२६ मध्ये निवडणूक होणार आहे. अनेक वर्षांपासून राज्यात मुख्य लढत द्रमुक विरुद्ध अण्णाद्रमुक अशी आहे. पण भाजपा मागील काही काळापासून राज्यात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. ताजा भाषावाद निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून निर्माण केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
एमएमआरडीए महानगर आयुक्त यांची कोरियन उच्चस्तरीय शिष्टमंडळाने घेतली भेट मुंबई : मुंबई हे जागतिक मानकांनुसार…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…