'पुढे सरका' असे सांगितल्याचा राग, वृद्ध महिलेने महिला कंडक्टरच्या हाताला घेतला चावा

  35

जळगाव : बसमध्ये गर्दी असताना वाहकाने “पुढे सरका” असे सांगितल्याचा राग आल्याने एका वृद्ध महिलेने महिला वाहकाच्या हाताला कडाडून चावा घेत जखमी केले. हा धक्कादायक प्रकार टॉवर चौकाजवळ घडला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जळगाव बसस्थानकातून नरगीस खलील मनियार (३६, रा. एस.टी. कॉलनी) या महिला वाहक आणि बस चालक बापू बाबुराव कोळी हे आसोदा-जळगाव (MH 14 DT 2175) या बसने मार्गस्थ झाले. बसमध्ये गर्दी असल्याने वाहकाने प्रवाश्यांना पुढे सरकण्यास सांगितले. मात्र, ७० वर्षीय सुशीला शिरसाठ (रा. नांद्रा) या वृद्ध महिलेला हे बोलणे खटकले आणि त्यांनी अचानक महिला वाहकाला शिवीगाळ करत हुज्जत घालायला सुरुवात केली.


बसमधील एका जेष्ठ किर्तनकार महाराजांनी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र संतापलेल्या वृद्ध महिलेने त्यांनाही चप्पल उगारून शिवीगाळ केली संतापाच्या भरात वृद्ध महिलेने महिला वाहकाचा हात घट्ट धरून पिरघळला आणि पंज्यावर जोरदार चावा घेतला, ज्यामुळे वाहकाच्या हातातून रक्तस्राव सुरू झाला. या घटनेने बसमध्ये एकच गोंधळ उडाला आणि बस चालकाने थेट बस शहर पोलिस ठाण्यात नेली. पोलिस ठाण्यात महिला वाहकाने संपूर्ण प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी सुशीला शिरसाठ यांची चौकशी केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली