'पुढे सरका' असे सांगितल्याचा राग, वृद्ध महिलेने महिला कंडक्टरच्या हाताला घेतला चावा

जळगाव : बसमध्ये गर्दी असताना वाहकाने “पुढे सरका” असे सांगितल्याचा राग आल्याने एका वृद्ध महिलेने महिला वाहकाच्या हाताला कडाडून चावा घेत जखमी केले. हा धक्कादायक प्रकार टॉवर चौकाजवळ घडला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जळगाव बसस्थानकातून नरगीस खलील मनियार (३६, रा. एस.टी. कॉलनी) या महिला वाहक आणि बस चालक बापू बाबुराव कोळी हे आसोदा-जळगाव (MH 14 DT 2175) या बसने मार्गस्थ झाले. बसमध्ये गर्दी असल्याने वाहकाने प्रवाश्यांना पुढे सरकण्यास सांगितले. मात्र, ७० वर्षीय सुशीला शिरसाठ (रा. नांद्रा) या वृद्ध महिलेला हे बोलणे खटकले आणि त्यांनी अचानक महिला वाहकाला शिवीगाळ करत हुज्जत घालायला सुरुवात केली.


बसमधील एका जेष्ठ किर्तनकार महाराजांनी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र संतापलेल्या वृद्ध महिलेने त्यांनाही चप्पल उगारून शिवीगाळ केली संतापाच्या भरात वृद्ध महिलेने महिला वाहकाचा हात घट्ट धरून पिरघळला आणि पंज्यावर जोरदार चावा घेतला, ज्यामुळे वाहकाच्या हातातून रक्तस्राव सुरू झाला. या घटनेने बसमध्ये एकच गोंधळ उडाला आणि बस चालकाने थेट बस शहर पोलिस ठाण्यात नेली. पोलिस ठाण्यात महिला वाहकाने संपूर्ण प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी सुशीला शिरसाठ यांची चौकशी केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,