Holi Festival : यंदा पुरणपोळीच्या गोडव्याला महागाईची चव

किमतीमध्ये पाच रुपयांची वाढ; खवय्यांकडून सर्वाधिक खरेदी


मुंबई : होळी (Holi Festival) म्हटली की तुपाच्या धारेसोबत गरम पुरणपोळीची (Puranpoli) आठवण येते. होळीला पुरणपोळीचा नैवेद्या लागतोच. आजही गृहिणी पुरणपोळ्या बनविण्यास प्राधान्या देतात. तर घर आणि नोकरी अशी दुहेरी जबाबदारी पेलणाऱ्या कारभारणी रेडिमेड पुराणपोळी आणण्यास पसंती देतात. मात्र यंदाच्या पुरपोळीच्या गोडव्याला महागाईचा रंग चढला आहे. पुरणपोळी गेल्या वर्षीपेक्षा पाच रुपयांनी महागली आहे. मात्र तरीही विक्रीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे विक्रेत्यांने सांगितले.


पूर्वी होळीची चाहूल लागल्यावर घरोघरी पुरणाचे साचे घासूनपुसून ठेवले जात. मात्र आता काळ बदलल्याने रेडिमेड पुरणपोळीची ऑर्डर देण्यासाठी नोकरदार महिलांची लगबग दिसून येत आहे. सर्वच क्षेत्रात महागाई वाढल्यामुळे पुरणपोळीही त्याला अपवाद ठरलेली नाही.



यंदा पुरणपोळीची किंमत पाच रुपयांनी वाढली आहे, तरीही मागणीवर कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी दोन नग पुरणपोळीसाठी ५० रुपये मोजावे लागत होते. यंदा मात्र ६० रुपचे खर्च करावे लागत आहे. मराठी घरात होळीला पुरणपोळीचा नैवेद्य लागतो. त्याचप्रमाणे अनेक बिगर मराठी लोकही होळीच्या दिवशी पुरणपोळीचा आस्वाद घेतात. त्यामुळे मागणीत वाढ होत असल्याचे विक्रेत्याने सांगितले. अधिक टिकाऊ असलेल्या तेलपोळ्याही होळीनिमित्त हातो-हात विकल्या जातात. मात्र महागाईमुळे या वर्षी खवय्यांना एका तेलपोळीसाठी ३० रुपये मोजावे लागत आहेत.



मजुरीमध्ये वाढ


पुरणपोळ्यांसाठी लागणाऱ्या तुपाच्या दरात वाढ झाली आहे. शिवाय पुरणपोळ्या तयार करणाऱ्या महिला दिवसावर काम करतात. आतापर्यंत २०० रुपये दिवसाला या महिला घेत होत्या. मात्र आता त्या दररोज पुरणपोळ्या बनविण्यासाठी ३०० रुपये घेतात. यामुळे दरवाढ करण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सणासुदीला घरात गोडधोड पदार्थ बनविण्याची पद्धत हळूहळू कमी होत असून विकत मिळणाऱ्या घरगुती पद्धतीच्या पदार्थांकडे गृहिणींचा कल वाढला आहे.

Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.