Holi Festival : यंदा पुरणपोळीच्या गोडव्याला महागाईची चव

किमतीमध्ये पाच रुपयांची वाढ; खवय्यांकडून सर्वाधिक खरेदी


मुंबई : होळी (Holi Festival) म्हटली की तुपाच्या धारेसोबत गरम पुरणपोळीची (Puranpoli) आठवण येते. होळीला पुरणपोळीचा नैवेद्या लागतोच. आजही गृहिणी पुरणपोळ्या बनविण्यास प्राधान्या देतात. तर घर आणि नोकरी अशी दुहेरी जबाबदारी पेलणाऱ्या कारभारणी रेडिमेड पुराणपोळी आणण्यास पसंती देतात. मात्र यंदाच्या पुरपोळीच्या गोडव्याला महागाईचा रंग चढला आहे. पुरणपोळी गेल्या वर्षीपेक्षा पाच रुपयांनी महागली आहे. मात्र तरीही विक्रीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे विक्रेत्यांने सांगितले.


पूर्वी होळीची चाहूल लागल्यावर घरोघरी पुरणाचे साचे घासूनपुसून ठेवले जात. मात्र आता काळ बदलल्याने रेडिमेड पुरणपोळीची ऑर्डर देण्यासाठी नोकरदार महिलांची लगबग दिसून येत आहे. सर्वच क्षेत्रात महागाई वाढल्यामुळे पुरणपोळीही त्याला अपवाद ठरलेली नाही.



यंदा पुरणपोळीची किंमत पाच रुपयांनी वाढली आहे, तरीही मागणीवर कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी दोन नग पुरणपोळीसाठी ५० रुपये मोजावे लागत होते. यंदा मात्र ६० रुपचे खर्च करावे लागत आहे. मराठी घरात होळीला पुरणपोळीचा नैवेद्य लागतो. त्याचप्रमाणे अनेक बिगर मराठी लोकही होळीच्या दिवशी पुरणपोळीचा आस्वाद घेतात. त्यामुळे मागणीत वाढ होत असल्याचे विक्रेत्याने सांगितले. अधिक टिकाऊ असलेल्या तेलपोळ्याही होळीनिमित्त हातो-हात विकल्या जातात. मात्र महागाईमुळे या वर्षी खवय्यांना एका तेलपोळीसाठी ३० रुपये मोजावे लागत आहेत.



मजुरीमध्ये वाढ


पुरणपोळ्यांसाठी लागणाऱ्या तुपाच्या दरात वाढ झाली आहे. शिवाय पुरणपोळ्या तयार करणाऱ्या महिला दिवसावर काम करतात. आतापर्यंत २०० रुपये दिवसाला या महिला घेत होत्या. मात्र आता त्या दररोज पुरणपोळ्या बनविण्यासाठी ३०० रुपये घेतात. यामुळे दरवाढ करण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सणासुदीला घरात गोडधोड पदार्थ बनविण्याची पद्धत हळूहळू कमी होत असून विकत मिळणाऱ्या घरगुती पद्धतीच्या पदार्थांकडे गृहिणींचा कल वाढला आहे.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात