Syed Abid Ali : भारताचे दिग्गज अष्टपैलू सईद अबिद अली यांचे निधन

सुनील गावसकरांकडूनही शोक व्यक्त


मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू सईद अबिद अली (Syed Abid Ali) यांचे बुधवारी (१२ मार्च) निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. ज्यावेळी फक्त प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले जायचे, त्यावेळी वनडे क्रिकेटप्रमाणे त्यांची खेळण्याची शैली होती. ते उजव्या हाताने मध्यमगी गोलंदाजी करायचे. तसेच त्यांचे क्षेत्ररक्षणही अफलातून हेते, तर तळात ते चांगली फलंदाजी करायचे.


९ सप्टेंबर १९४१ रोजी हैदराबादला जन्म झालेल्या सईद अबिद अली यांनी १९६७ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेड येथे भारताकडून कसोटी पदार्पण केले होते. त्यांनी २९ कसोटी सामने खेळताना ४७ विकेट्स घेतल्या. त्यांनी १९७४ साली वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने ५ वनडे सामने खेळले असून ७ विकेट्स घेतल्या आहेत. त्यांनी कसोटीत १०१८ धावाही केल्या, ज्यात ६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांनी एकूण २१२ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ३९७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ८७३२ धावा केल्या आहेत. त्यांनी लिस्ट ए क्रिकेटचे १२ सामने खेळले, ज्यात १९ विकेट्स घेतल्या आणि १६९ धावा केल्या.



माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी लिहिले, ‘खूप दु:खद बातमी आहे. त्यांचं हृदय सिंहासारखं होतं. ते संघासाठी काहीही करायला तयार असायचे. जेव्हा गरज पडेल तेव्हा मधल्या फळीतील फलंदाज असूनही त्यांनी सलामीलाही फलंदाजी केली. लेग कॉर्डनला आपल्या सर्वोत्तम फिरकी चौकडीच्या गोलंदाजीवर काही अफलातून झेल घेतले. जर मला नीट आठवत असेल, तर नवीन चेंडूने गोलंदाजी करणाऱ्या सईद यांनी कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर दोनदा विकेट घेण्याचा अनोखा विक्रमही केला होता. त्यांना धावायला आवडायचे. माझ्या पदार्पणाच्या सामन्याच त्याला फलंदाजीत बढती मिळाल्यानंतर त्यांची ही रणनीती महत्त्वाची ठरली होती, ज्यामुळे काही ओव्हरथ्रोमुळे दबाव कमी झाला होता. ते जंटलमन होते.'

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला