Syed Abid Ali : भारताचे दिग्गज अष्टपैलू सईद अबिद अली यांचे निधन

  47

सुनील गावसकरांकडूनही शोक व्यक्त


मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू सईद अबिद अली (Syed Abid Ali) यांचे बुधवारी (१२ मार्च) निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. ज्यावेळी फक्त प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले जायचे, त्यावेळी वनडे क्रिकेटप्रमाणे त्यांची खेळण्याची शैली होती. ते उजव्या हाताने मध्यमगी गोलंदाजी करायचे. तसेच त्यांचे क्षेत्ररक्षणही अफलातून हेते, तर तळात ते चांगली फलंदाजी करायचे.


९ सप्टेंबर १९४१ रोजी हैदराबादला जन्म झालेल्या सईद अबिद अली यांनी १९६७ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेड येथे भारताकडून कसोटी पदार्पण केले होते. त्यांनी २९ कसोटी सामने खेळताना ४७ विकेट्स घेतल्या. त्यांनी १९७४ साली वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने ५ वनडे सामने खेळले असून ७ विकेट्स घेतल्या आहेत. त्यांनी कसोटीत १०१८ धावाही केल्या, ज्यात ६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांनी एकूण २१२ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ३९७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ८७३२ धावा केल्या आहेत. त्यांनी लिस्ट ए क्रिकेटचे १२ सामने खेळले, ज्यात १९ विकेट्स घेतल्या आणि १६९ धावा केल्या.



माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी लिहिले, ‘खूप दु:खद बातमी आहे. त्यांचं हृदय सिंहासारखं होतं. ते संघासाठी काहीही करायला तयार असायचे. जेव्हा गरज पडेल तेव्हा मधल्या फळीतील फलंदाज असूनही त्यांनी सलामीलाही फलंदाजी केली. लेग कॉर्डनला आपल्या सर्वोत्तम फिरकी चौकडीच्या गोलंदाजीवर काही अफलातून झेल घेतले. जर मला नीट आठवत असेल, तर नवीन चेंडूने गोलंदाजी करणाऱ्या सईद यांनी कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर दोनदा विकेट घेण्याचा अनोखा विक्रमही केला होता. त्यांना धावायला आवडायचे. माझ्या पदार्पणाच्या सामन्याच त्याला फलंदाजीत बढती मिळाल्यानंतर त्यांची ही रणनीती महत्त्वाची ठरली होती, ज्यामुळे काही ओव्हरथ्रोमुळे दबाव कमी झाला होता. ते जंटलमन होते.'

Comments
Add Comment

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या

हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण ? मुख्यमंत्र्यांना पाठवणार प्रस्ताव...

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.  आदिवासी समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये