चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला मिळाले तब्बल इतक्या कोटींचे बक्षीस

दुबई : दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या विजेतेपदाच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करून तिसऱ्यांदाचॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. पराभवानंतरही न्यूझीलंड संघ श्रीमंत होणार आहे, कारण आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी मोठी बक्षीस रक्कम ठेवली होती. आयसीसीने २०१७ च्या तुलनेत बक्षीसाच्या रकमेत ५३ टक्के वाढ केली होती. यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेत्या संघाला १९.४५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल.तर उपविजेत्या संघाला ९.७२ कोटी रुपये दिले जातील. त्याचप्रमाणे, उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना ४.८६ कोटी रुपये दिले जाणार आहे.


भारताने विजेतेपद जिंकल्यामुळे भारतीय संघाला थेट २.२४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे २० कोटी रुपये मिळाले. याशिवाय, स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आणि लीग फेज सामने जिंकल्याबद्दल टीम इंडियाला बक्षीस रक्कम देखील मिळाली आहे. अशाप्रकारे, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल एकूण भारतीय संघाला सुमारे २१ कोटी ५१ लाख रुपये मिळतील. उपविजेता ठरलेला न्यूझीलंड संघाला ९.७२ कोटी रुपये दिले जातील. याशिवाय, न्यूझीलंड संघाला लीग फेज सामने जिंकल्याबद्दल सहभागाचे बक्षीस आणि बक्षीस मिळेल. अशाप्रकारे, या संघाची एकूण बक्षीस रक्कम सुमारे ११ कोटी ४४ लाख रुपये होते.


चॅम्पियन्स ट्रॉफीमधील प्रत्येक सामना बक्षीस रकमेच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. गट टप्प्यातील प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला २९.५४ लाख रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर असलेल्या संघाला ३.०३ कोटी रुपये मिळतील तर सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघांना १.२१ कोटी रुपये मिळतील. या मेगा-मॅचमध्ये सहभागी होणाऱ्या आठही संघांना अतिरिक्त १.०८ कोटी रुपये मिळतील. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पाकिस्तानच्या यजमानपदाखाली भव्य पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील भारताचे सर्व सामने सुरक्षेच्या कारणामुळे दुबईमध्ये खेळले गेले, तर इतर सात संघांचे सामने पाकिस्तानमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणी खेळले गेले. या महान सामन्याच्या चालू आवृत्तीत पाकिस्तानची कामगिरी काही खास नव्हती. संघाने तीन पैकी दोन लीग सामने गमावले, तर एक सामना पावसामुळे खेळवता आला नाही. विशेष म्हणजे पाकिस्तान संघ एकही सामना न जिंकता चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला.

Comments
Add Comment

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

IPL 2026 Players Auction : अंतिम यादी जाहीर; ७७ जागांसाठी ३५० खेळाडूंवर बोली, त्यापैकी २४० भारतीय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा २०२६ चा खेळाडू लिलाव १६ डिसेंबरला अबुधाबी येथे होणार असून, या वेळी एकूण ३५०

IPL 2026 Auction: टॉप 5 गटात 34 खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2026 मिनी लिलावासाठी एकूण 350 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आलेली आहे . टॉप खेळाडूंसाठी पाच गट करण्यात आले आहेत.

Fruad In Cricket : क्रिकेटविश्वातला महाघोटाळा, एकाच पत्त्यावर आढळले १२ खेळाडू

पुद्दुचेरी : भारतीय क्रिकेटचा जागतिक पातळीवर दबदबा आहेच. बीसीसीआयची आर्थिक ताकद, आयपीएलसारख्या जगातील सर्वात