चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला मिळाले तब्बल इतक्या कोटींचे बक्षीस

दुबई : दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या विजेतेपदाच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करून तिसऱ्यांदाचॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. पराभवानंतरही न्यूझीलंड संघ श्रीमंत होणार आहे, कारण आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी मोठी बक्षीस रक्कम ठेवली होती. आयसीसीने २०१७ च्या तुलनेत बक्षीसाच्या रकमेत ५३ टक्के वाढ केली होती. यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेत्या संघाला १९.४५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल.तर उपविजेत्या संघाला ९.७२ कोटी रुपये दिले जातील. त्याचप्रमाणे, उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना ४.८६ कोटी रुपये दिले जाणार आहे.


भारताने विजेतेपद जिंकल्यामुळे भारतीय संघाला थेट २.२४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे २० कोटी रुपये मिळाले. याशिवाय, स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आणि लीग फेज सामने जिंकल्याबद्दल टीम इंडियाला बक्षीस रक्कम देखील मिळाली आहे. अशाप्रकारे, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल एकूण भारतीय संघाला सुमारे २१ कोटी ५१ लाख रुपये मिळतील. उपविजेता ठरलेला न्यूझीलंड संघाला ९.७२ कोटी रुपये दिले जातील. याशिवाय, न्यूझीलंड संघाला लीग फेज सामने जिंकल्याबद्दल सहभागाचे बक्षीस आणि बक्षीस मिळेल. अशाप्रकारे, या संघाची एकूण बक्षीस रक्कम सुमारे ११ कोटी ४४ लाख रुपये होते.


चॅम्पियन्स ट्रॉफीमधील प्रत्येक सामना बक्षीस रकमेच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. गट टप्प्यातील प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला २९.५४ लाख रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर असलेल्या संघाला ३.०३ कोटी रुपये मिळतील तर सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघांना १.२१ कोटी रुपये मिळतील. या मेगा-मॅचमध्ये सहभागी होणाऱ्या आठही संघांना अतिरिक्त १.०८ कोटी रुपये मिळतील. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पाकिस्तानच्या यजमानपदाखाली भव्य पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील भारताचे सर्व सामने सुरक्षेच्या कारणामुळे दुबईमध्ये खेळले गेले, तर इतर सात संघांचे सामने पाकिस्तानमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणी खेळले गेले. या महान सामन्याच्या चालू आवृत्तीत पाकिस्तानची कामगिरी काही खास नव्हती. संघाने तीन पैकी दोन लीग सामने गमावले, तर एक सामना पावसामुळे खेळवता आला नाही. विशेष म्हणजे पाकिस्तान संघ एकही सामना न जिंकता चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य