चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला मिळाले तब्बल इतक्या कोटींचे बक्षीस

दुबई : दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या विजेतेपदाच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करून तिसऱ्यांदाचॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. पराभवानंतरही न्यूझीलंड संघ श्रीमंत होणार आहे, कारण आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी मोठी बक्षीस रक्कम ठेवली होती. आयसीसीने २०१७ च्या तुलनेत बक्षीसाच्या रकमेत ५३ टक्के वाढ केली होती. यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेत्या संघाला १९.४५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल.तर उपविजेत्या संघाला ९.७२ कोटी रुपये दिले जातील. त्याचप्रमाणे, उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना ४.८६ कोटी रुपये दिले जाणार आहे.


भारताने विजेतेपद जिंकल्यामुळे भारतीय संघाला थेट २.२४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे २० कोटी रुपये मिळाले. याशिवाय, स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आणि लीग फेज सामने जिंकल्याबद्दल टीम इंडियाला बक्षीस रक्कम देखील मिळाली आहे. अशाप्रकारे, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल एकूण भारतीय संघाला सुमारे २१ कोटी ५१ लाख रुपये मिळतील. उपविजेता ठरलेला न्यूझीलंड संघाला ९.७२ कोटी रुपये दिले जातील. याशिवाय, न्यूझीलंड संघाला लीग फेज सामने जिंकल्याबद्दल सहभागाचे बक्षीस आणि बक्षीस मिळेल. अशाप्रकारे, या संघाची एकूण बक्षीस रक्कम सुमारे ११ कोटी ४४ लाख रुपये होते.


चॅम्पियन्स ट्रॉफीमधील प्रत्येक सामना बक्षीस रकमेच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. गट टप्प्यातील प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला २९.५४ लाख रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर असलेल्या संघाला ३.०३ कोटी रुपये मिळतील तर सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघांना १.२१ कोटी रुपये मिळतील. या मेगा-मॅचमध्ये सहभागी होणाऱ्या आठही संघांना अतिरिक्त १.०८ कोटी रुपये मिळतील. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पाकिस्तानच्या यजमानपदाखाली भव्य पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील भारताचे सर्व सामने सुरक्षेच्या कारणामुळे दुबईमध्ये खेळले गेले, तर इतर सात संघांचे सामने पाकिस्तानमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणी खेळले गेले. या महान सामन्याच्या चालू आवृत्तीत पाकिस्तानची कामगिरी काही खास नव्हती. संघाने तीन पैकी दोन लीग सामने गमावले, तर एक सामना पावसामुळे खेळवता आला नाही. विशेष म्हणजे पाकिस्तान संघ एकही सामना न जिंकता चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला.

Comments
Add Comment

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

भारताला मोठा धक्का: दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी तीन T20 सामन्यांमधून बाहेर!

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे

वन डे रँकिंगमध्ये स्मृती मानधनाचे वर्चस्व कायम

मुंबई : आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने चमकदार कामगिरी केली

‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा हिकारू नाकामुरावर पलटवार

मुंबई  : ‘चॅम्पियन्स शोडाउन’ या प्रतिष्ठित रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय विश्वविजेता डी.