चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला मिळाले तब्बल इतक्या कोटींचे बक्षीस

दुबई : दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या विजेतेपदाच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करून तिसऱ्यांदाचॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. पराभवानंतरही न्यूझीलंड संघ श्रीमंत होणार आहे, कारण आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी मोठी बक्षीस रक्कम ठेवली होती. आयसीसीने २०१७ च्या तुलनेत बक्षीसाच्या रकमेत ५३ टक्के वाढ केली होती. यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेत्या संघाला १९.४५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल.तर उपविजेत्या संघाला ९.७२ कोटी रुपये दिले जातील. त्याचप्रमाणे, उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना ४.८६ कोटी रुपये दिले जाणार आहे.


भारताने विजेतेपद जिंकल्यामुळे भारतीय संघाला थेट २.२४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे २० कोटी रुपये मिळाले. याशिवाय, स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आणि लीग फेज सामने जिंकल्याबद्दल टीम इंडियाला बक्षीस रक्कम देखील मिळाली आहे. अशाप्रकारे, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल एकूण भारतीय संघाला सुमारे २१ कोटी ५१ लाख रुपये मिळतील. उपविजेता ठरलेला न्यूझीलंड संघाला ९.७२ कोटी रुपये दिले जातील. याशिवाय, न्यूझीलंड संघाला लीग फेज सामने जिंकल्याबद्दल सहभागाचे बक्षीस आणि बक्षीस मिळेल. अशाप्रकारे, या संघाची एकूण बक्षीस रक्कम सुमारे ११ कोटी ४४ लाख रुपये होते.


चॅम्पियन्स ट्रॉफीमधील प्रत्येक सामना बक्षीस रकमेच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. गट टप्प्यातील प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला २९.५४ लाख रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर असलेल्या संघाला ३.०३ कोटी रुपये मिळतील तर सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघांना १.२१ कोटी रुपये मिळतील. या मेगा-मॅचमध्ये सहभागी होणाऱ्या आठही संघांना अतिरिक्त १.०८ कोटी रुपये मिळतील. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पाकिस्तानच्या यजमानपदाखाली भव्य पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील भारताचे सर्व सामने सुरक्षेच्या कारणामुळे दुबईमध्ये खेळले गेले, तर इतर सात संघांचे सामने पाकिस्तानमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणी खेळले गेले. या महान सामन्याच्या चालू आवृत्तीत पाकिस्तानची कामगिरी काही खास नव्हती. संघाने तीन पैकी दोन लीग सामने गमावले, तर एक सामना पावसामुळे खेळवता आला नाही. विशेष म्हणजे पाकिस्तान संघ एकही सामना न जिंकता चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला.

Comments
Add Comment

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात