चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला मिळाले तब्बल इतक्या कोटींचे बक्षीस

  91

दुबई : दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या विजेतेपदाच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करून तिसऱ्यांदाचॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. पराभवानंतरही न्यूझीलंड संघ श्रीमंत होणार आहे, कारण आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी मोठी बक्षीस रक्कम ठेवली होती. आयसीसीने २०१७ च्या तुलनेत बक्षीसाच्या रकमेत ५३ टक्के वाढ केली होती. यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेत्या संघाला १९.४५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल.तर उपविजेत्या संघाला ९.७२ कोटी रुपये दिले जातील. त्याचप्रमाणे, उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना ४.८६ कोटी रुपये दिले जाणार आहे.


भारताने विजेतेपद जिंकल्यामुळे भारतीय संघाला थेट २.२४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे २० कोटी रुपये मिळाले. याशिवाय, स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आणि लीग फेज सामने जिंकल्याबद्दल टीम इंडियाला बक्षीस रक्कम देखील मिळाली आहे. अशाप्रकारे, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल एकूण भारतीय संघाला सुमारे २१ कोटी ५१ लाख रुपये मिळतील. उपविजेता ठरलेला न्यूझीलंड संघाला ९.७२ कोटी रुपये दिले जातील. याशिवाय, न्यूझीलंड संघाला लीग फेज सामने जिंकल्याबद्दल सहभागाचे बक्षीस आणि बक्षीस मिळेल. अशाप्रकारे, या संघाची एकूण बक्षीस रक्कम सुमारे ११ कोटी ४४ लाख रुपये होते.


चॅम्पियन्स ट्रॉफीमधील प्रत्येक सामना बक्षीस रकमेच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. गट टप्प्यातील प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला २९.५४ लाख रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर असलेल्या संघाला ३.०३ कोटी रुपये मिळतील तर सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघांना १.२१ कोटी रुपये मिळतील. या मेगा-मॅचमध्ये सहभागी होणाऱ्या आठही संघांना अतिरिक्त १.०८ कोटी रुपये मिळतील. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पाकिस्तानच्या यजमानपदाखाली भव्य पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील भारताचे सर्व सामने सुरक्षेच्या कारणामुळे दुबईमध्ये खेळले गेले, तर इतर सात संघांचे सामने पाकिस्तानमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणी खेळले गेले. या महान सामन्याच्या चालू आवृत्तीत पाकिस्तानची कामगिरी काही खास नव्हती. संघाने तीन पैकी दोन लीग सामने गमावले, तर एक सामना पावसामुळे खेळवता आला नाही. विशेष म्हणजे पाकिस्तान संघ एकही सामना न जिंकता चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला.

Comments
Add Comment

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का

लंडन: लीड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाला सपाटून मार खावा लागला होता. आता दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलच्या भारतीय

क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव रुग्णालयात

नवी दिल्ली : भारताच्या टी २० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव जर्मनीतील रुग्णालयात आहे. सूर्यकुमार यादववर

अभिनेता सलमान खान बनला दिल्ली फ्रँचायझीचा मालक

नवी दिल्ली : देशातील पहिली आणि सर्वात मोठी टेनिस बॉल टी-१० क्रिकेट लीग इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या तिसऱ्या