Onion : उन्हाळी कांद्याची आवक वाढली!

पुणे : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात उन्हाळी कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात कांद्याला प्रती १० किलोला २७० ते ३०० बाजारभाव मिळत होता. त्यामुळे उन्हाळी कांदा काढल्यामुळे शेतकरी लगेच विक्रीसाठी आणू लागल्याने सर्वत्रच आवक वाढल्याने बाजार भाव कोसळले असून प्रती १० किलोला १७० ते १८० बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.


लोणी येथील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात एकूण २६०७ कांदा पिशवीचे आवक झाली एक नंबर गोळा कांदा प्रती दहा किलो कांदा १७० ते १८० रुपये या भावाने विकला गेला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली.



लोणी बाजार आवारात कांद्याची आवक वाढल्याने बाजारभाव कमी झाले आहेत. शेतकरी शेतात काढलेला कांदा लगेच विक्रीसाठी आणत आहेत. कांद्याचे प्रति दहा किलोचे दर एक नंबर गोळा कांदा १७० ते १८० रुपये , दोन नंबर कांदे १३० ते १६० रुपये, गुलटी कांदा ६० ते १२० रुपये, बदला कांद्यास ३० ते ५० रुपये असा बाजारभाव मिळाला आहे.

Comments
Add Comment

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.

National Teacher Award 2026 : महाराष्ट्रातील ४ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation)

CM Devendra Fadnavis : नवी मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक ‘प्रहारी’ सीसीटीव्ही कमांड सेंटर कार्यान्वित; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे : नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील