Pune Gaurav Ahuja : पुणे पोलिसांनी बड्या बापाच्या उद्दाम मुलाचा माज धिंड काढून उतरवला

पुणे : विद्येचं माहेर घर मानल्या जाणाऱ्या पुण्यात गुन्ह्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचं पुण्यात काही दिवसांपूर्वी दोन बड्या घरातील मुलांनी नशेत अश्लील कृत्य केल्याचं समोर आलं. याप्रकरणी गौरव अहुजा (Gaurav Ahuja) आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी ज्या ठिकाणी हे कृत्य केले त्याच ठिकाणी पोलिसांनी त्यांची धिंड काढल्याचे समोर आले आहे.




काही दिवसांपूर्वी गौरव अहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांचा अश्लील व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. शोधमोहिमेनंतर पोलिसांना भाग्येश ओसवाल याला अटक करण्यात यश आलं मात्र गौरव अहुजा फरार झाला होता. घटनेच्या काही तासानंतर गौरव अहुजा (Pune Gaurav Ahuja) हा कराड पोलिसांना सरेंडर झाला होता. तसेच त्याने सोशल मीडियावरही व्हिडीओ शेअर करुन माफी मागितली होती. आपण कराड पोलिसांना शरण येत असून सर्व पुणेकरांची माफी मागतो, मला एक संधी द्या असा व्हिडिओ त्याने व्हायरल केला. त्यानंतर येरवडा पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. गौरवने ज्या ठिकाणी हे कृत्य केलं होतं, त्याच ठिकाणाहून सोमवारी त्याची आणि त्याच्या मित्राची धिंड काढत पोलिसांनी त्यांचा माज उतरवला आहे.


या प्रकरणी गौरव अहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. ही कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही न्यायालयात हजर केले असता पुणे सत्र न्यायालयाने गौरव आहुजाला एक दिवसाची पोलीस कोठडी तर भाग्येश ओसवाल याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कृत्याचे समाज माध्यमांवर कौतुक केले जात आहे.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या