Palghar News : शिमगा सण ऐरणीवर असताना वाडा तालुक्यातील मजुरांवर उपासमारीची वेळ

  53

थकीत मजुरीसाठी श्रमजीवी संघाचा वाडा तहसील कार्यालयावर मोर्चा


वाडा : थकीत मजुरीसाठी श्रमजीवी संघाचा वाडा तहसील कार्यालयवर मोर्चा काढण्यात आला. प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे म्हणून २००५ मध्ये नरेगा व नंतर नाव बदलून २००९ मध्ये मनरेगा योजना सुरू केली असून या योजनेकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हजारो नागरिकांना हक्काच्या रोजगारापासून वंचित रहावे लागत आहे. वाडा तालुका हा ग्रामीण तथा आदिवासी बहुल तालुका असून मोठ्या संख्येने नागरिक महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत काम करत असून सदर वाडा तालुक्यातील मजुरांची मजुरी डिसेंबर महिन्यापासून ९,२४,५८,९०५ रुपये एवढी मजूरी थकीत असून शिमगा सण ऐरणीवर असतांना हातावर उपजीविका असणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.


पोटाची खळगी भरायची कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. सर्वत्र होळी सण साजरा करण्याच्या तयारीत असताना मजुरांना केलेल्या कामाच्या मजुरीसाठी उन्हा, तान्हात मोर्चा काढावा लागत आहे ही शोकांतिका आहे. वाडा तालुक्याची ६००० मजुरांची थकीत मजुरी डिसेंबर महिन्यापासून ९,२४,५८,९०५ रुपये तात्काळ अदा करण्यात यावी. केंद्र शासनाकडून हमी प्रमाणे १०० दिवस व राज्य शासनाच्या हमी प्रमाणे २६५ दिवस असे ३६५ दिवस काम उपलब्ध करून देण्यात यावे. गाव पाड्यांना रस्ते जोडण्याचे काम मनरेगा मधून होत असून नव्याने रस्त्यांची कामे करण्यासाठी स्थगिती दिल्यामुळे अनेक गाव पाडे रस्त्यांपासून वंचित राहीले आहेत, तसेच अकुशल मजुराच्या हाताचे काम बंद झाले आहे म्हणून तात्काळ रस्त्यांची कामे सुरू करण्यात यावीत.



ज्या मजुरांनी कामाची मागणी केलेली आहे अशा मजुरांना बेरोजगार भत्ता देण्यात यावा. मंजूर वनपट्ट्यावर बांध बंदिस्तीचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे. या मागण्या घेऊन श्रामजीवी संघटनेचे वाडा तालुका अध्यक्ष भरत जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सचिव सुरज दळवी, संपर्क प्रमुख रफिक चौधरी, जिल्हा महिला ठिणगी उपप्रमुख रेखा पऱ्हाड, सचिव् आदेश वाघ, चंदर गवते सुजाता पारधी यांच्यासह शेकडो महिला मजूर उपस्थित होत्या.

Comments
Add Comment

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९