Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मिसिंग लिंकचे ९३ टक्के काम पूर्ण

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (Mumbai-Pune Expressway) खोपोली- कुसगाव दरम्यान १९.८० किमी लांबीच्या नवीन मार्गिकेचे (मिसिंग लिंक) (Mumbai-Pune Expressway missing link) काम हाती घेतले आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ९३ टक्के काम पूर्ण झाले असून आता कामाला वेग देण्यात आला. उर्वरित काम ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. हा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबई – पुणे प्रवासाचे अंतर २० ते २५ मिनिटांनी कमी होणार आहे.


या (Mumbai-Pune Expressway) प्रकल्पाच्या कामास २०१९ मध्ये दोन टप्प्यात सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्याचे काम मे. नवयुग इंजिनीअरिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेडला, तर दुसऱ्या टप्प्याचे काम मे. एफकाँन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला देण्यात आले. हे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आव्हानात्मक काम असल्याने आणि काही तांत्रिक अडचणी आल्याने प्रकल्पास विलंब झाला असून आजही या प्रकल्पाचे काम सुरू आहे.



आता या (Mumbai-Pune Expressway) प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ९३ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. मुंबई – पुणे प्रवास ऑगस्टपासून आणखी सुसाट आणि सुकर होण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.