Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मिसिंग लिंकचे ९३ टक्के काम पूर्ण

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (Mumbai-Pune Expressway) खोपोली- कुसगाव दरम्यान १९.८० किमी लांबीच्या नवीन मार्गिकेचे (मिसिंग लिंक) (Mumbai-Pune Expressway missing link) काम हाती घेतले आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ९३ टक्के काम पूर्ण झाले असून आता कामाला वेग देण्यात आला. उर्वरित काम ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. हा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबई – पुणे प्रवासाचे अंतर २० ते २५ मिनिटांनी कमी होणार आहे.


या (Mumbai-Pune Expressway) प्रकल्पाच्या कामास २०१९ मध्ये दोन टप्प्यात सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्याचे काम मे. नवयुग इंजिनीअरिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेडला, तर दुसऱ्या टप्प्याचे काम मे. एफकाँन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला देण्यात आले. हे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आव्हानात्मक काम असल्याने आणि काही तांत्रिक अडचणी आल्याने प्रकल्पास विलंब झाला असून आजही या प्रकल्पाचे काम सुरू आहे.



आता या (Mumbai-Pune Expressway) प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ९३ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. मुंबई – पुणे प्रवास ऑगस्टपासून आणखी सुसाट आणि सुकर होण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

ठाणे आणि डोंबिवली स्थानकाच्या विस्तारासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेचा मुंबई विभाग हा १५ डब्यांच्या गाड्या सामावून घेण्यासाठी ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म

विक्रोळी पूर्व - पश्चिम उड्डाणपुलावर तेल गळती, दुचाकीस्वार घसरून पडले; महापौरांनी केली मदत

महापौरांनी ताफा थांबवून यंत्रणांना केल्या सूचना मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विक्रोळी पूर्व - पश्चिम जोडणाऱ्या

मध्य रेल्वेचा ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेचा मुंबई विभाग विविध अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्तीची कामं करण्यासाठी रविवार २२ मार्च २०२६

मुंबईतील १३ नवीन मराठी शाळांना अनुदान मंजूर

प्रथमच अनुदान मंजूर झालेल्या २२ शाळांमध्ये १३ मराठी माध्यमांच्या शाळांचा समावेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

बोरिवलीत तीन दिवसांचा मिलेट महोत्सव

मुंबई : राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये (मिलेट्स) आहेत. कमी पाण्यावर येणारी तसेच पर्यावरणपूरक

बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व ‘मॅग्नेट’ प्रकल्पासाठी एडीबी सहकार्य करणार

मुंबई : महाराष्ट्रातील कृषी बाजार व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी आशियाई विकास बँकेचे (एडीबी)