Ujani Dam : उजनी धरणात ८८.३० टीएमसी पाणीसाठा

  37

सोलापूर : उजनी धरणातून ६ मार्चपासून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले असून २५ मेपर्यंत कालव्याचे पाणी सुरू राहणार आहे. साधारणतः १६ टीएमसी पाणी (सलग दोन आवर्तने) त्यासाठी लागणार आहे. सध्या कालव्यातील पाण्याचा विसर्ग २१०० क्युसेक करण्यात आला असून दोन दिवसांत मोहोळ तालुक्यातून पाणी पुढे मार्गस्थ होणार आहे. सध्या उजनी धरणात एकूण ८८.३० टीएमसी पाणी असून त्यात २४.६० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.



सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून शेतीपिकांना पाण्याची गरज आहे. जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरला उजनी धरणाचे पाणी थेट मिळते. दरम्यान, मागील तीन वर्षांत यंदा पहिल्यांदाच शेतीसाठी तीन आवर्तने, त्यातही ऐन उन्हाळ्यात सलग दोन आवर्तने सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय मुंबईत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून कालव्यातून सुरवातीला ७०० क्युसेकने सोडलेले पाणी सध्या २१०० क्युसेक करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम