Budget 2025 : आज राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर होणार

मुंबई : महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प उद्या सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडला जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत दुपारी दोन वाजता राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असून, या अर्थसंकल्पात राज्याचे महायुती सरकार सर्वसामान्य जनतेला कोणता दिलासा देते याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय घोषणा करण्यात आल्याने राज्याच्या आर्थिक तिजोरीवर मोठा भार पडला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे ४७ हजार कोटींचा बोजा पडत आहे.



राज्यावर सद्यस्थिती आठ लाख कोटींहून अधिक कर्ज असून राज्य सरकारच्या उत्पन्नाचा बराचसा भाग हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्ते पेन्शन आणि त्याचबरोबर कर्जफेडीचे हप्ते आणि लोकप्रिय योजनांच्या अंमलबजावणीवरच खर्च होत आहे. राज्याची महसुली तूट दीड लाखांत दीड लाख कोटींच्या घरात गेली आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांना त्यांच्या आजवरच्या अर्थमंत्रालयाच्या अनुभवाचा पूर्ण कस लावावा लागणार आहे.त्यामुळे उद्या मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात राज्याचे महायुती सरकार महाराष्ट्रातील जनतेला नेमका कोणता दिलासा देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल