Budget 2025 : आज राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर होणार

मुंबई : महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प उद्या सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडला जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत दुपारी दोन वाजता राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असून, या अर्थसंकल्पात राज्याचे महायुती सरकार सर्वसामान्य जनतेला कोणता दिलासा देते याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय घोषणा करण्यात आल्याने राज्याच्या आर्थिक तिजोरीवर मोठा भार पडला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे ४७ हजार कोटींचा बोजा पडत आहे.



राज्यावर सद्यस्थिती आठ लाख कोटींहून अधिक कर्ज असून राज्य सरकारच्या उत्पन्नाचा बराचसा भाग हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्ते पेन्शन आणि त्याचबरोबर कर्जफेडीचे हप्ते आणि लोकप्रिय योजनांच्या अंमलबजावणीवरच खर्च होत आहे. राज्याची महसुली तूट दीड लाखांत दीड लाख कोटींच्या घरात गेली आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांना त्यांच्या आजवरच्या अर्थमंत्रालयाच्या अनुभवाचा पूर्ण कस लावावा लागणार आहे.त्यामुळे उद्या मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात राज्याचे महायुती सरकार महाराष्ट्रातील जनतेला नेमका कोणता दिलासा देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल