Budget 2025 : आज राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर होणार

मुंबई : महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प उद्या सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडला जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत दुपारी दोन वाजता राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असून, या अर्थसंकल्पात राज्याचे महायुती सरकार सर्वसामान्य जनतेला कोणता दिलासा देते याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय घोषणा करण्यात आल्याने राज्याच्या आर्थिक तिजोरीवर मोठा भार पडला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे ४७ हजार कोटींचा बोजा पडत आहे.



राज्यावर सद्यस्थिती आठ लाख कोटींहून अधिक कर्ज असून राज्य सरकारच्या उत्पन्नाचा बराचसा भाग हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्ते पेन्शन आणि त्याचबरोबर कर्जफेडीचे हप्ते आणि लोकप्रिय योजनांच्या अंमलबजावणीवरच खर्च होत आहे. राज्याची महसुली तूट दीड लाखांत दीड लाख कोटींच्या घरात गेली आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांना त्यांच्या आजवरच्या अर्थमंत्रालयाच्या अनुभवाचा पूर्ण कस लावावा लागणार आहे.त्यामुळे उद्या मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात राज्याचे महायुती सरकार महाराष्ट्रातील जनतेला नेमका कोणता दिलासा देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाई मुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला