Team india: २ वर्ल्डकप, २ टी-२० वर्ल्डकप आणि ३ चॅम्पियन्स ट्रॉफी...भारताच्या नावावर ७ आयसीसी खिताब

मुंबई: भारताने रविवारी न्यूझीलंडला चार विकेटनी हरवत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वर शिक्कामोर्तब केले. या विजयासह भारतीय संघाने आपला सातवा आयसीसीचा खिताब मिळवला आहे. या आठ संघांच्या स्पर्धेत भारताने आपला तिसरा विजय मिळवला. भारत दीर्घकाळापासून वर्ल्ड क्रिकेटच्या प्रमुख संघांपैकी एक आहे. ते सातत्याने या नॉकआऊट पर्यंत पोहोचत होते. भारतीय संघाने २००३ आणि २०२३ वनडे वर्ल्डकप, २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१९-२१ आणि २०२१-२३च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपर्यंत पोहोचले होते.


आयसीसीच्या एकूण खिताबांपैकी बोलायचे झाल्यास तर ऑस्ट्रेलिया सगळ्यात यशस्वी संघ आहे. त्यांनी सहावेळा वनडे वर्ल्डकप २००३, २००७, २०१५, २०२३ , एकदा टी-२० वर्ल्डकप २०२१, दोन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी(२००६, २००९) आणि एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप(२०२१-२३) जिंकला आहे. यासोबतच एकूण मिळून १० खिताब होतात.



भारताचे आयसीसी स्पर्धेतील खिताब


१९८३ वनडे वर्ल्डकप - कपिल देवच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदा आयसीसी स्पर्धा जिंकली. वेस्ट इंडिजला हरवत त्यांनी नवा इतिहास रचला.


२००२ चॅम्पियन्स ट्रॉफी(श्रीलंकेसोबत संयुक्तपणे) - सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारताने शानदार कामगिरी केली. मात्र सातत्याने पावसामुळे श्रीलंकेसोबत ट्रॉफी शेअर करावी लागली.


२००७ टी-२० वर्ल्डकप - महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला. त्यांनी फायनलमध्ये पाकिस्तानला हरवले.


२०११ वनडे वर्ल्डकप - धोनीच्या नेतृत्वात भारताने तब्बल २८ वर्षांनी श्रीलंकेला हरवत दुसरा वनडे वर्ल्डकप जिंकला.


२०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी - धोनीच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडला पाच धावांनी हरवत चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवली.


२०२४ टी-२० वर्ल्डकप - विराट कोहली आणि रोहित शर्माच्या टी-२० करिअरमधीन अंतिम टप्प्यावर भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवत दुसरा टी-२० वर्ल्डकप जिंकला.


२०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी - भारतीय संघाने न्यूझीलंडला ४ विकेटनी हरवत सातवा आयसीसीचा खिताब मिळवला.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य