Maharashtra Budget 2025 : संगमेश्वरात छत्रपती संभाजी महाराजांचे तर आग्र्यात शिवरायांचे स्मारक

अर्थसंकल्पीय भाषणात मोठी घोषणा


मुंबई : महाराष्ट्राचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2025) विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार आणि विधानपरिषदेत वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मांडला. यंदाच्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका करत सर्वसामान्य नागरिकांना कोणताही दिलासा न दिल्याचा आरोप केला. मात्र, राज्य सरकारने या अर्थसंकल्पाद्वारे छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित एक मोठी घोषणा केली आहे.


संगमेश्वरातील सरदेसाईवाडा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. हिंदी चित्रपट छावा प्रदर्शित झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान संपूर्ण देशभर पोहोचले.



अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रक्षण आणि विस्तार करण्यासाठी संभाजी महाराजांनी अतुलनीय धैर्याने संघर्ष केला. त्यांच्या पराक्रमाच्या खुणा ज्या ठिकाणी आहेत, त्यापैकी संगमेश्वर हे एक महत्त्वाचे स्थान आहे."


याच ठिकाणी संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या विशाल सेनेशी हातावर मोजता येतील एवढ्या मावळ्यांसह लढा दिला होता. त्यांच्या पराक्रमाची आठवण जपण्यासाठी संगमेश्वर येथे भव्य स्मारक उभारले जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले. या घोषणेनंतर सभागृहात "छत्रपती संभाजी महाराज की जय" आणि "हर हर महादेव" च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले.



तुळापूर आणि वढु बुद्रुक येथे स्मारक उभारणी प्रगतीपथावर


छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ तुळापूर आणि समाधीस्थळ वढु बुद्रुक येथे भव्य स्मारक उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच, दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला "छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत" पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.


हरियाणातील पानिपत येथेही स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या मराठा वीरांच्या स्मृतीसाठी स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हरियाणा शासनाच्या मदतीने या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.



आग्र्यात शिवरायांचे स्मारक


अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान, अर्थमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भात आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. शिवरायांच्या आग्रा येथील नजरकैदेतून सुटकेच्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आग्र्यात भव्य स्मारक उभारण्यात येईल. त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.



आंबेगावातील शिवसृष्टीसाठी ५० कोटींचा निधी


पुण्यातील आंबेगाव येथे चार टप्प्यांत भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारला जात आहे. यातील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने पार पडावे यासाठी राज्य शासनाने अतिरिक्त ५० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार