जेजुरी गडावर जाताय तर आधी हे वाचा...

  51

पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल, असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे, पाश्चिमात्य कपडे परिधान करुन भाविकांना जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेता येणार नाही.


यासाठी देवस्थान ट्रस्टने नियमावली जाहीर केली आहे. यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असणार आहे. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असे नियम लागू करण्यात आले आहे. पुरूष व महिला भाविकांना मंदिरात कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही असे नियमच लावण्यात आला आहे.

फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बर्मुडा, शॉर्ट, स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देवदर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे. गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड-कमी कपडे घालणाऱ्यांसही प्रवेश बंदी असणार आहे. तर हे नियम पाळण्याचं आवाहन सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे.


चंपाषष्ठीला याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनाला येतात. कारण चंपाषष्ठीच्या दिवशी कुलधर्म असतो. यामुळे भाविक श्रद्धेने देवस्थानामध्ये येऊन खंडेरायाच्या दर्शन घेतात. यातच आता महिला आणि पुरुषांना सारखेच असे काही नियम लावण्यात आले आहेत. ज्याचे पालन करण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्ट व विश्वस्त मंडळ करत आहेत.
Comments
Add Comment

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांना भरवा लागणार युजर शुल्क

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार या प्रतिक्षेत गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईकर आहेत. परंतू

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

Devendra Fadanvis 'आम्ही सर्व जनतेचे सेवक', लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...

मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरुन अडचणीत वाढ

पंचवटीसह द्वारका परिसरात सलग पाचव्या दिवशी पाणीटंचाई

नागरिक त्रस्त : निलगिरी बाग केंद्रावर तांत्रिक बिघाड जैसे थे नाशिक : निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला