जेजुरी गडावर जाताय तर आधी हे वाचा...

पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल, असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे, पाश्चिमात्य कपडे परिधान करुन भाविकांना जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेता येणार नाही.


यासाठी देवस्थान ट्रस्टने नियमावली जाहीर केली आहे. यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असणार आहे. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असे नियम लागू करण्यात आले आहे. पुरूष व महिला भाविकांना मंदिरात कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही असे नियमच लावण्यात आला आहे.

फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बर्मुडा, शॉर्ट, स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देवदर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे. गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड-कमी कपडे घालणाऱ्यांसही प्रवेश बंदी असणार आहे. तर हे नियम पाळण्याचं आवाहन सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे.


चंपाषष्ठीला याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनाला येतात. कारण चंपाषष्ठीच्या दिवशी कुलधर्म असतो. यामुळे भाविक श्रद्धेने देवस्थानामध्ये येऊन खंडेरायाच्या दर्शन घेतात. यातच आता महिला आणि पुरुषांना सारखेच असे काही नियम लावण्यात आले आहेत. ज्याचे पालन करण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्ट व विश्वस्त मंडळ करत आहेत.
Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू