Water Shortage : अमरावतीकरांनो पाणी जपून वापरा! महिनाभरात जलसाठ्यात १२ टक्‍क्‍यांची घट

अमरावती : उन्हाची तीव्रता वाढू लागली असून ग्रामीण व डोंगराळ भागात पाणी टंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघू, अशा एकूण ५६ सिंचन प्रकल्पांत सद्यस्थितीत ५४ टक्के (५६८ दलघमी) जलसाठा शिल्लक आहे. यामुळे या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या शहरी व ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना पुरेसा जलसाठा मिळणार आहे. या भागांना टंचाईच्या झळा बसणार नसल्या तरी दोन मध्यम व लघू प्रकल्पांच्या क्षेत्रातील योजनांना मात्र टंचाईच्या झळा पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्‍या महिनाभरात पाणीसाठ्यात १२ टक्‍क्‍यांची घट झाली आहे.



जिल्ह्यात अप्पर वर्धा या मोठ्या प्रकल्पासह सात मध्यम व ४८ लघू प्रकल्प आहेत. फेब्रुवारीच्‍या पहिल्‍या आठवड्यापर्यंत ६६ टक्‍के पाणीसाठा शिल्‍लक होता, तो आता ५४ टक्‍क्‍यांवर आला आहे. अप्पर वर्धा धरणात विद्यमान स्थितीत ३२० दलघमी (५६ टक्के) जलसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्पातून अमरावती शहरासह ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना पुरवठा करण्यात येतो. हा जलसाठा उन्हाळ्यात कमी पडणार नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. यंदा पावसाळ्यात मुबलक पाऊस झाल्याने धरणे शंभर टक्के भरली होती.सात मध्यम प्रकल्पांतील जलसाठ्याची स्थिती सध्‍या चांगली आहे. एकूण १३७ दलघमी (५३ टक्के) जलसाठा या प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत असून पंढरी व बोर्डीनाला या प्रकल्पातील साठा मे महिन्याच्या मध्यात संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तर शहानूर, चंद्रभागा, सपन व पूर्णा या प्रकल्पातील जलसाठा सध्या सरासरीने उत्तम असला तरी पुढील हंगामात पावसाला विलंब झाल्यास टंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


लघू प्रकल्पांच्या क्षेत्रातील पाणीपुरवठा योजना अडचणीत येण्याची शक्यता असून पाणीटंचाई निर्माण होण्याचा अंदाज आहे. ४८ लघू प्रकल्पांत ४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यातील काही प्रकल्पांनी तळ गाठण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे लघू प्रकल्पांच्या क्षेत्रातील नागरिकांना टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता अधिक आहे.



पाणीसाठ्याची सद्यस्थिती (दलघमी / टक्के)



  • अप्पर वर्धा- ३२० / ५६

  • शहानूर – २९ / ६४

  • चंद्रभागा – ३१ / ७७

  • पूर्णा – २५ / ७१

  • सपन – ३३ / ८७

  • पंढरी – १४ / २५

  • बोर्डीनाला – २.४३ / २०


४८ लघू प्रकल्प – ११० / ४८
Comments
Add Comment

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, प्रशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

सातारा : साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. या

फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, निलंबित PSI बदनेचा शोध सुरू

सातारा : सातारा जिल्हातील फलटण मधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलिसांना २४ तासांच्या आत आरोपी प्रशांत