Kalyan Update : कल्याणमध्ये दोन रेडी मिक्सरनी नऊ वाहनांना चिरडले

कल्याण : कल्याण मधून मोठी बातमी समोर आली आहे.(Kalyan Update) कल्याण पूर्वेकडील लिंक रोडवर भीषण अपघात घडला आहे. या घटनेत दोन रेडी मिक्सरनी नऊ वाहनांना धडक देऊन चिरडले आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक झाली आहे.



कल्याण पूर्वेतील पुना लिंक रोडला असलेला विजयनगर हा वर्दळीचा परिसर आहे. या परिसरात सतत वाहनांची ये-जा असते. सुदैवाने अपघाताच्या वेळेस वर्दळ कमी असल्याने मोठी जीवित हानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार, विजयनगरमधील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ड प्रभाग कार्यालयासमोरून दोन रेडी मिक्सर वाहने पाठोपाठ उतारावरून चक्कीनाक्याकडे जात होती. उतारावर असताना एका रेडी मिक्सरचा ब्रेक निकामी झाला. मागून चाललेल्या रेडी मिक्सरच्या चालकाला समोरील रेडी मिक्सरचा ब्रेक निकामी झाल्याचे समजताच, चालकाने पुढच्या मिक्सरला रोखण्यासाठी आपला मिक्सर पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र या गडबडीत ब्रेक निकामी झालेला रेडी मिक्सर समोरच्या टेम्पोवर जाऊन धडकला. त्यामुळे टेम्पो बाजुच्या झाडासह दुकानांच्या समोर धडकला. टेम्पोला धडक बसल्याने टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टेम्पोची धडक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाक्यांसह रिक्षांना बसली. बेसावध टेम्पो चालक झाड आणि दुकानांना धडकल्याने टेम्पोमधील व्यक्ती चालकाच्या केबीनमध्ये चिरडला गेला.


परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी तातडीने हालचाली करून क्रेन बोलावून अपघातग्रस्त वाहने मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरून बाजुला केली. या अपघाताविषयी पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

Comments
Add Comment

यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमा ? जाणून घ्या या तिथीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

कोजागिरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणार भारतीय हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा दिवस आहे. आणि इंग्रजी

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे चिपळूणमध्ये पुराचा धोका

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण शहराला असलेल्या पुराच्या धोक्याबाबत उपाययोजना सूचविण्यासाठी राज्य सरकारने जलसंपदा

मंत्री नितेश राणेंचा वैभववाडीत उबाठावर मोठा घाव!

मंगेश लोकेंसह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश ओरोस (वार्ताहर) : वैभववाडी तालुक्यात उद्धव

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

रायगड जिल्हा परिषदेत २ हजार ६०९ पदे रिक्त

अलिबाग (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विकासाला गती देण्याचे काम रायगड जिल्हा परिषदेचे असले, तरी जिल्हा परिषदेत

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील