Gudi Padwa Special : गुढीपाडव्याच्या तोंडावर साखरगाठी महागल्या

अमरावती : दरवर्षी महाशिवरात्रीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर साखरगाठी बनविल्या जातात. सध्या परतवाडा येथे जोरात गाठ्या बनवण्यास वेग आल्याचे दिसते. वाढत्या महागाईमुळे याच साखरगाठीच्या किंमती गगनाला भिडल्याचे चित्र आहे. साखर आणि मजुरीच्या दरात मोठी वाढ झाल्याने यंदा साखरगाठी हाराच्या दरात सुमारे चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.


ऐन होळी, गुडीपाडवा सणात सर्व सामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून महागाईने उच्चांक गाठला असून त्याचा फटका साखर गाठीहार तयार करणाऱ्या व्यवसायिकांना देखील बसला दरवाढीनी गाठीची मोडी ठरविली आहे. साखरे बरोबरच इतर कच्या मालाच्या दरात दुप्पट-तीप्पट वाढ झाली आहे. त्यातच गुजरातमधून आलेल्या साखरगाठीचाही स्थानिक व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. होळीला अर्पण करुन लहान मुलांना रंगपंचमीच्छा दिवशी गुलाल लावून ही गाठी घालण्याची पद्धत आहे. मराठी नववर्ष दिन म्हणजेच गुढीपाडवा आता काही दिवसांवर आलाय. घरोघरी त्याची तयारी सुरू झाली.



गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याबरोबरच साखरगाठीचं महत्त्व आहे. विशेषतः घरातील लहान मुलांना या साखरगाठींचा हार आवर्जून देण्यात येतो. त्याचबरोबर देवाला आणि गुढीलाही ही साखरगाठी अर्पण केली जाते. या काळात लग्न ठरलेल्या व लग्न झालेल्या नववधुला गाठी व साडीचोळी देण्याची प्रथा पुर्वीपासुन आज ही चालु आहे. त्यामुळे गाठीचे अधिक महत्व असले तरी महगाईने मात्र नागरीकांना हैराण केले आहे. त्यामुळे या होळीत आणि पुढीपाडव्याला याचा आर्थिक फटका नागरीकांना सहन करावा लागणार आहे.

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना