Gudi Padwa Special : गुढीपाडव्याच्या तोंडावर साखरगाठी महागल्या

  56

अमरावती : दरवर्षी महाशिवरात्रीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर साखरगाठी बनविल्या जातात. सध्या परतवाडा येथे जोरात गाठ्या बनवण्यास वेग आल्याचे दिसते. वाढत्या महागाईमुळे याच साखरगाठीच्या किंमती गगनाला भिडल्याचे चित्र आहे. साखर आणि मजुरीच्या दरात मोठी वाढ झाल्याने यंदा साखरगाठी हाराच्या दरात सुमारे चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.


ऐन होळी, गुडीपाडवा सणात सर्व सामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून महागाईने उच्चांक गाठला असून त्याचा फटका साखर गाठीहार तयार करणाऱ्या व्यवसायिकांना देखील बसला दरवाढीनी गाठीची मोडी ठरविली आहे. साखरे बरोबरच इतर कच्या मालाच्या दरात दुप्पट-तीप्पट वाढ झाली आहे. त्यातच गुजरातमधून आलेल्या साखरगाठीचाही स्थानिक व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. होळीला अर्पण करुन लहान मुलांना रंगपंचमीच्छा दिवशी गुलाल लावून ही गाठी घालण्याची पद्धत आहे. मराठी नववर्ष दिन म्हणजेच गुढीपाडवा आता काही दिवसांवर आलाय. घरोघरी त्याची तयारी सुरू झाली.



गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याबरोबरच साखरगाठीचं महत्त्व आहे. विशेषतः घरातील लहान मुलांना या साखरगाठींचा हार आवर्जून देण्यात येतो. त्याचबरोबर देवाला आणि गुढीलाही ही साखरगाठी अर्पण केली जाते. या काळात लग्न ठरलेल्या व लग्न झालेल्या नववधुला गाठी व साडीचोळी देण्याची प्रथा पुर्वीपासुन आज ही चालु आहे. त्यामुळे गाठीचे अधिक महत्व असले तरी महगाईने मात्र नागरीकांना हैराण केले आहे. त्यामुळे या होळीत आणि पुढीपाडव्याला याचा आर्थिक फटका नागरीकांना सहन करावा लागणार आहे.

Comments
Add Comment

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, एसटी साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणार...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना