Holi Special : होळीपूर्वीच पाण्याचे फुगे भिरकवण्याच्या घटनेत वाढ

ठाणे : प्लॅस्टिक पिशव्या (फुगे) प्रदूषणास कारणीभूत ठरत असून देखील फारसे कोणी गांभीर्याने याकडे बघत नाही. अशातच होलिकोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अगोदरच बच्चे कंपनी प्लॅस्टिक पिशव्यांचे पाण्याचे फुगे मारण्यासाठी तत्पर झालेले दिसतात. ठाणे शहरात फुग्यांसाठी लागणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या गल्ली बोळात उपलब्ध असून " अॅडव्हान्स होळी"(Holi Special) शब्द प्रयोग वापरून फुगे मारण्याचा आनंद लुटत आहेत. मात्र आनंदाचा बेरंग करणारे फुग्यांसाठी लागणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदी केवळ कागदावर दिसणार का,असा सवाल उपस्थित होत आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर फुगे मारण्यास सुरुवात झाली आहे.



लहान मुले ठिकठिकाणी पाण्याने भरलेले प्लॅस्टिक पिशव्यांचे फुगे अंगावर मारताना दिसू लागले आहेत. यातच फुगे मारताना दुखापत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली, तरी बिनधास्तपणे फुगे फेकण्याचा कार्यक्रम ठिकठिकाणी सुरू आहे. पिशव्या विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई का होत नाही असा सवाल ठाणेकरांनी केला आहे.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.