PM Kisan : पीएम किसान सम्मान निधी योजनेत १८१ बोगस बांगलादेशी लाभार्थी

  111

नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेअंतर्गत १८१ बोगस लाभार्थीची नावे आढळून आली असून, हे लाभार्थी बांगलादेशी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कृषी अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्यास भेट देत तातडीने चौकशीची मागणी केली आहे.


किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, बांगलादेशी घुसखोरीचा आणि सरकारी योजनांचा (PM Kisan) गैरवापर रोखणे अत्यावश्यक आहे.



ग्रामस्थांची सतर्कता आणि आठवडाभराच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला. या १८१ लाभार्थ्यांना (PM Kisan)  पहिला हप्ता वितरित करण्यात आला. मात्र, याबाबत शंका निर्माण झाल्यानंतर पुढील हप्ते तत्काळ रोखण्यात आले. तहसीलदारांनी या प्रकरणी तक्रार दाखल करण्याचे मान्य केले असून, पोलिसांनीही गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे.


सुरुवातीच्या तपासात या लाभार्थ्यांची बँक खाती बांगलादेशच्या सीमेलगत असलेल्या गावांशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे. हे प्रकरण केवळ (PM Kisan) एकाच योजनेपुरते मर्यादित आहे की अन्य योजनांच्या बाबतीतही असे घडले आहे, याचा सखोल तपास सुरू आहे. गरज पडल्यास केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि सायबर सेलची मदत घेतली जाणार आहे.


भादवण गावातील जागरूक ग्रामस्थांनी हा प्रकार लक्षात आणून दिला. यामुळे हा घोटाळा वेळीच उघड झाला. मालेगाव जन्मदाखला घोटाळ्यासारखाच हा प्रकार मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता दर्शवतो. पोलीस आणि प्रशासन या संपूर्ण प्रकरणाचा (PM Kisan) तपास करून सत्य बाहेर काढण्यासाठी सज्ज झाले आहेत.


या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, अजूनही काही बोगस लाभार्थ्यांची नावे यादीत (PM Kisan) असण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या दक्षतेमुळे पुढील आर्थिक नुकसान टळले असले, तरी हे संपूर्ण रॅकेट शोधण्यासाठी अधिक गहन तपासाची गरज आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत