प्रहार    

नितेश राणे आणि अनिल परब यांच्यात शा‍ब्दिक चकमक, कामकाज तहकूब

  95

नितेश राणे आणि अनिल परब यांच्यात शा‍ब्दिक चकमक, कामकाज तहकूब मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रमाणे माझाही पक्ष बदलावा यासाठी छळ झाला, असे वक्तव्य उद्धव गटाचे आमदार अनिल परब यांनी केले. या वक्तव्याद्वारे अनिल परब यांनी स्वतःची तुलना थेट छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी केली. या प्रकाराने सत्ताधारी आक्रमक झाले. अनिल परब यांच्या विरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली. भाजपाने अनिल परब यांच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. सभागृहात मंत्री नितेश राणे आणि अनिल परब यांच्यात शा‍ब्दिक चकमक झाली. आमदार अनिल परब यांनी माफी मागावी, अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनिल परब यांच्या वक्तव्याच्या मुद्यावरुन संघर्ष झाला. अखेर सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.



राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलायच्यावेळी अनिल परब यांनी वेगळ्याच विषयावर बोलायला सुरुवात केली. यावरुन सभागृहात गोंधळ झाला. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोला, असे सांगितल्यावर राज्यपालांचे अभिभाषण गेले... असे वक्तव्य आमदार अनिल परब यांनी केले. यावरुन तर प्रचंड गदारोळ झाला. राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहात बोलताना भाषा कशी वापरावी याचेही भान आमदार महोदय बळगणार नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. सभागृहात या मुद्यावरुन प्रचंड गदारोळ झाला.
Comments
Add Comment

प्रसिद्ध मराठी कलाकार किशोर कदम यांचे मुंबईतलं घर धोक्यात! मुख्यमंत्र्यांना केले मदतीचे आवाहन, नेमकं प्रकरण काय?

कमिटी, पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने घोटाळा घडवल्याचा केला आरोप  मुंबई: कवी सौमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले

ओप्पोने के13 टर्बो सीरिजमध्ये दोन नवे गेमिंग स्मार्टफोन केले लॉन्च

मुंबई : ओप्पोने आपल्या गेमिंग केंद्रित के13 टर्बो मालिकेत दोन नवे स्मार्टफोन के13 टर्बो प्रो

अंगारकी संकष्टी चतुर्थीसाठी मेट्रोची सेवा वाढवली!

मुंबई : १२ ऑगस्ट रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी

खेकडे पकडायला गेले आणि बुडून मेले

कांदिवलीतील तलावात खेकडे पकडताना पिता-पुत्राचा बुडून मृत्यू मुंबई : कांदिवली पूर्व येथे एका तलावात खेकडे

राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी विभागातील सर्वांनी प्रयत्न करावेत : मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्यात मत्स्योत्पादन वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. यंदाच्या हंगामामध्ये राज्यात ४७ टक्के मत्स्योत्पादन

ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ : मुंबईत क्रिकेट स्टार्सचा मेळावा, ट्रॉफी टूरला जल्लोषात सुरुवात

मुंबई : मुंबईत आज ‘ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५’ च्या ‘५० दिवस बाकी’ कार्यक्रमाला क्रिकेट जगतातील दिग्गजांची