नितेश राणे आणि अनिल परब यांच्यात शा‍ब्दिक चकमक, कामकाज तहकूब

मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रमाणे माझाही पक्ष बदलावा यासाठी छळ झाला, असे वक्तव्य उद्धव गटाचे आमदार अनिल परब यांनी केले. या वक्तव्याद्वारे अनिल परब यांनी स्वतःची तुलना थेट छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी केली. या प्रकाराने सत्ताधारी आक्रमक झाले. अनिल परब यांच्या विरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली. भाजपाने अनिल परब यांच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. सभागृहात मंत्री नितेश राणे आणि अनिल परब यांच्यात शा‍ब्दिक चकमक झाली. आमदार अनिल परब यांनी माफी मागावी, अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनिल परब यांच्या वक्तव्याच्या मुद्यावरुन संघर्ष झाला. अखेर सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.



राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलायच्यावेळी अनिल परब यांनी वेगळ्याच विषयावर बोलायला सुरुवात केली. यावरुन सभागृहात गोंधळ झाला. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोला, असे सांगितल्यावर राज्यपालांचे अभिभाषण गेले... असे वक्तव्य आमदार अनिल परब यांनी केले. यावरुन तर प्रचंड गदारोळ झाला. राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहात बोलताना भाषा कशी वापरावी याचेही भान आमदार महोदय बळगणार नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. सभागृहात या मुद्यावरुन प्रचंड गदारोळ झाला.
Comments
Add Comment

मुख्यमंत्र्यांच्या घरातील किचन क्विन कोण? सकाळच्या नाश्त्याला काय आहार करतात अमृता फडणवीस?

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा नेहमी

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

मंगळवारपासून डॉक्टरांचा आमरण उपोषणाचा इशारा

मुंबई :  मुंबईतील रुग्णालये आणि खासगी दवाखान्यांमधून निर्माण होणारा जैवरासायनिक कचरा संकलनाचे काम राज्य

‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ सविस्तर प्रकल्प अहवालासाठी प्रक्रिया सुरू

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने प्रस्तावित एकात्मिक भुयारी रस्ता प्रकल्पासाठी’

पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार प्रस्तावित

दक्षिण मुंबई ते ठाणे प्रवास होणार सुसाट मुंबई : पूर्व मुक्तमार्ग म्हणजेच इस्टर्न फ्रीवेच्या विस्तार करण्याचा

महाराष्ट्र हेच भारताचे ‘स्टार्टअप कॅपिटल’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही नावीन्यपूर्ण कल्पना असणाऱ्या प्रत्येकाला नवउद्योजक बनण्याची