नितेश राणे आणि अनिल परब यांच्यात शा‍ब्दिक चकमक, कामकाज तहकूब

मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रमाणे माझाही पक्ष बदलावा यासाठी छळ झाला, असे वक्तव्य उद्धव गटाचे आमदार अनिल परब यांनी केले. या वक्तव्याद्वारे अनिल परब यांनी स्वतःची तुलना थेट छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी केली. या प्रकाराने सत्ताधारी आक्रमक झाले. अनिल परब यांच्या विरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली. भाजपाने अनिल परब यांच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. सभागृहात मंत्री नितेश राणे आणि अनिल परब यांच्यात शा‍ब्दिक चकमक झाली. आमदार अनिल परब यांनी माफी मागावी, अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनिल परब यांच्या वक्तव्याच्या मुद्यावरुन संघर्ष झाला. अखेर सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.



राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलायच्यावेळी अनिल परब यांनी वेगळ्याच विषयावर बोलायला सुरुवात केली. यावरुन सभागृहात गोंधळ झाला. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोला, असे सांगितल्यावर राज्यपालांचे अभिभाषण गेले... असे वक्तव्य आमदार अनिल परब यांनी केले. यावरुन तर प्रचंड गदारोळ झाला. राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहात बोलताना भाषा कशी वापरावी याचेही भान आमदार महोदय बळगणार नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. सभागृहात या मुद्यावरुन प्रचंड गदारोळ झाला.
Comments
Add Comment

राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध

मुंबई : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग

महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी

डिजिटल गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ, सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमधून मुंबईकरांची १२७ कोटींची लूट

मुंंबई: सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमुळे मुंबईकरांना १२७ कोटी रुपयांना लुबाडले असल्याचा आकडा पोलीस तपासातून

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या

ज्येष्ठांचा सन्मान करून साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांप्रती बांधिलकी जपणारा

मुंबईतील पाणी कपात घेतली मागे, काय आहे कारण..

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रस्तावित आहे.