Satara : आईच्या आग्रहाने वाचले मुलाचे प्राण!

  40

सातारा : प्रत्येक आईला तिच्या लेकाचं भविष्य दिसतं असे म्हटले जाते. त्यामुळे आईला देवाचं दुसरं रुप मानलं जातं. हिच घटना सत्यात उतरल्याचे समोर आले आहे. राज्यभरात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. या अपघातग्रस्तांमध्ये विना हेल्मेट दुचाकी चालक आणि त्याच्या मागे बसलेल्यांची संख्या अधिक आहे. यात अनेकांचा जीवही गेलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने हेल्मेट घालण्याची सक्ती केली आहे. मात्र तरीही अनेक तरुण हेल्मेट न घालता प्रवास करताना दिसून येतात. अशीच काहीशी घटना साताऱ्यात घडली आहे.



साताऱ्यातील मोळाचा ओढा परिसरातील सूरज जाधव (२४) हा तरुण त्याचा मित्र पिंटू ऊर्फ राजेश रिदि (२४) यासह दुचाकीवरुन पुण्याला निघाला होता. मात्र यावेळी तो हेल्मेट न घालता घराबाहेर पडला. हेल्मेट न घेता मुलगा घरातून बाहेर गेला मुलान हेल्मेट घालावं, असं आईला मनोमन वाटत होत. 'हेल्मेट घालूनच गाडी चालव' असा आग्रह देखील सूरजच्या आईने धरला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून तो तसाच निघाला. आईला घरात हेल्मेट दिसल्याने ती स्वत: पाठोपाठ हेल्मेट घेऊन निघली. मुलाला जिथे आहे, तिथेच थांबण्यास सांगितले. पुढे गेला असशील, तर मी तिथपर्यंत येते, असाही आग्रह आईने धरला. त्यामुळे सूरजने दुचाकी पुन्हा साताऱ्याच्या दिशेने वळवली आणि घरी येऊन हेल्मेट घेतले.


सूरजने घरातून निघताना 'आई, मी नेहमीच गाडीवरून जातो. कशाला टेन्शन घेतेस? असं तो म्हणाला. मात्र काही सांगू नकोस. तू हेल्मेट डोक्यात घाल आणि आणि पोहोचल्यानंतर फोन कर. असं सांगत आईनं मुलाला निरोप दिला. परंतु अवघ्या दिड तासात आईचा फोन खणखणला. तुमच्या मुलाचा अपघात झाला. दोघांनाही पुण्याला हलवलंय. ते ऐकून आईच्या पायाखालची जमीन हादरली. शेजाऱ्यांन सोबत ती बसने पुण्याला निघाली. बसमध्ये बसतानाच पुन्हा फोन वाजला. यावेळी ''आई, मी सूरज बोलतोय, आमचा अपघात झालाय. मी ठीक आहे. पण, पिंटूला खूप लागलंय. त्याला पुण्याला अॅडमिट करतोय. आई तू हेल्मेट दिल्यामुळे माला काहीही झालं नाही. परंतु पिंटूने हेल्मेट न घातल्यामुळे तो कोमा गेला आहे''. सूरजने असे सांगताच आईच्या जीवात जीव आला.


त्यानंतर सूरजची आई पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर मुलाला सुखरूप पाहताच आईने कडकडून मिठी मारली. मात्र, सूरजचा मित्र राजेश या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे या आईच्या एका डोळ्यांत आसू आणि दुसऱ्या डोळ्यांत हसू अशी अवस्था निर्माण झाली होती.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित