Satara : आईच्या आग्रहाने वाचले मुलाचे प्राण!

Share

सातारा : प्रत्येक आईला तिच्या लेकाचं भविष्य दिसतं असे म्हटले जाते. त्यामुळे आईला देवाचं दुसरं रुप मानलं जातं. हिच घटना सत्यात उतरल्याचे समोर आले आहे. राज्यभरात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. या अपघातग्रस्तांमध्ये विना हेल्मेट दुचाकी चालक आणि त्याच्या मागे बसलेल्यांची संख्या अधिक आहे. यात अनेकांचा जीवही गेलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने हेल्मेट घालण्याची सक्ती केली आहे. मात्र तरीही अनेक तरुण हेल्मेट न घालता प्रवास करताना दिसून येतात. अशीच काहीशी घटना साताऱ्यात घडली आहे.

साताऱ्यातील मोळाचा ओढा परिसरातील सूरज जाधव (२४) हा तरुण त्याचा मित्र पिंटू ऊर्फ राजेश रिदि (२४) यासह दुचाकीवरुन पुण्याला निघाला होता. मात्र यावेळी तो हेल्मेट न घालता घराबाहेर पडला. हेल्मेट न घेता मुलगा घरातून बाहेर गेला मुलान हेल्मेट घालावं, असं आईला मनोमन वाटत होत. ‘हेल्मेट घालूनच गाडी चालव’ असा आग्रह देखील सूरजच्या आईने धरला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून तो तसाच निघाला. आईला घरात हेल्मेट दिसल्याने ती स्वत: पाठोपाठ हेल्मेट घेऊन निघली. मुलाला जिथे आहे, तिथेच थांबण्यास सांगितले. पुढे गेला असशील, तर मी तिथपर्यंत येते, असाही आग्रह आईने धरला. त्यामुळे सूरजने दुचाकी पुन्हा साताऱ्याच्या दिशेने वळवली आणि घरी येऊन हेल्मेट घेतले.

सूरजने घरातून निघताना ‘आई, मी नेहमीच गाडीवरून जातो. कशाला टेन्शन घेतेस? असं तो म्हणाला. मात्र काही सांगू नकोस. तू हेल्मेट डोक्यात घाल आणि आणि पोहोचल्यानंतर फोन कर. असं सांगत आईनं मुलाला निरोप दिला. परंतु अवघ्या दिड तासात आईचा फोन खणखणला. तुमच्या मुलाचा अपघात झाला. दोघांनाही पुण्याला हलवलंय. ते ऐकून आईच्या पायाखालची जमीन हादरली. शेजाऱ्यांन सोबत ती बसने पुण्याला निघाली. बसमध्ये बसतानाच पुन्हा फोन वाजला. यावेळी ”आई, मी सूरज बोलतोय, आमचा अपघात झालाय. मी ठीक आहे. पण, पिंटूला खूप लागलंय. त्याला पुण्याला अॅडमिट करतोय. आई तू हेल्मेट दिल्यामुळे माला काहीही झालं नाही. परंतु पिंटूने हेल्मेट न घातल्यामुळे तो कोमा गेला आहे”. सूरजने असे सांगताच आईच्या जीवात जीव आला.

त्यानंतर सूरजची आई पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर मुलाला सुखरूप पाहताच आईने कडकडून मिठी मारली. मात्र, सूरजचा मित्र राजेश या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे या आईच्या एका डोळ्यांत आसू आणि दुसऱ्या डोळ्यांत हसू अशी अवस्था निर्माण झाली होती.

Recent Posts

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

2 minutes ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

17 minutes ago

शापित चित्रकेतू झाला वृत्रासूर

भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…

32 minutes ago

प्रतिज्ञापत्रातील साक्षीदार

अ‍ॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…

42 minutes ago

गुणसुंदर…

पूनम राणे अधिकाराची खुर्ची आपल्याला ईश्वरी कृपेने मिळते. त्या खुर्चीला शोभा कशी आणायची, हे आपल्या…

1 hour ago

मैत्र जीवांचे…

राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…

1 hour ago