Mutual Fund: महिलांना पडतेय म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीची भुरळ, ५ वर्षात दुप्पट झाली गुंतवणूक

मुंबई: शेअर बाजारातील गुंतवणूक सध्या महिलांना भुरळ घालत आहे. अशातच भारतातील महिला गुंतवणूकदारांची संख्याही वेगाने वाढत आहे. यात महिला मोठ्या संख्येने म्यच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करत आहेत. महिलांच्या वाढत्या गुंतवणुकीमुळे त्यांचे अॅसेट्स अंडर मॅनेजमेंट मार्च २०१९मध्ये ४.५९ लाख कोटी रूपयांनी वाढून मार्च २०२४मध्ये ११.२५ लाख कोटी रूपये झाले. ही संख्या दुप्पट आहे.


समोर आलेल्या माहितीनुसार, महिला गुंतवणूकदार एकूण व्यक्तिगत गुंतवणुकीच्या एयूएमच्या ३३ टक्के भागीदारीचे प्रतिनिधित्व करतात. रिपोर्टनुसार, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिलांच्या संख्येतही वाढ होत आहे. आता प्रत्येक चार गुंतवणूकदारांपैकी एक महिला आहे.


या व्यतिरिक्त महिलांसाठीच्या गुंतवणूक पोर्टफोलिओच्या सरासरी आकारात वाढ पाहायला मिळाली. मार्च २०१९ आणि मार्च २०१४ या दरम्यान त्यांच्या फोलिओ आकारात २४ टक्क्यांची वाढ झाली. ही मार्च २०२४मध्ये वाढून १०.६२ लाख कोटी रूपये झाली. मार्च २०१९मध्ये ही रक्कम २.६६ लाख कोटी रूपये होती.


या वाढीचे कारण एसआयपीची वाढती क्रेझ आहे. १८ ते ३४ वर्ष वयोगटामध्ये एसआयपीमध्ये गुंतवणुकीची क्रेझ वाढत आहे. या वयोगटाच्या एसआयपी एयूएममध्ये गेल्या पाच वर्षांत २.६ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला