चारित्र्याच्या संशयावरून रागात गर्भवती पत्नीचा खून

नाशिक: चारित्र्याचा संशयावरून रागाच्या भरात पतीने १९ वर्षीय गर्भवती पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने पत्नीचा गळा आवळून खून करीत पत्नीचा मृतदेह गंगापूर रोडवरील शहिद अरुण चित्ते पुलाजवळील टाकून दिला. मात्र पोलीस तपासात पतीचे बिंग फुटले. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

अमृताकुमारी विकीरॉय यादव (१९ सध्या रा. सातपूर, मूळ नेपाळ) असे मृत पत्नीचे नाव आहे. विकीरॉय यादव (२०) असे ताब्यात घेतलेल्या पतीचे नाव आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर रोडवरील आसाराम बापू आश्रमासमोरील नदीपात्रालगत झाडाझुडपात मंगळवारी सकाळी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. नाशिक तालुका पोलिसांनी मृतदेहाचे फोटो शहर व ग्रामीण पोलिसांना पाठवले. त्यामुळे वर्णन पंचवटी पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद असलेल्या महिलेशी जुळाले. मृतदेहावरील कपडे आणि टॅटू पाहून मृतदेह पत्नीचा असल्याचे पतीने सांगितले.

दरम्यान, चौकशीत पतीने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. चारित्र्याचा संशय व विवाहात सासरच्यांनी काहीही न दिल्याने माहेरून पैसे आणावे, यासाठी पत्नीचा छळ केला. त्याने पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केला व मृतदेह झुडूपात टाकून पळ काढला. त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची नोंद दिल्याचे पोलीस तपासात समोर आल्याचे वृत्त आहे. पुढील तपास नाशिक तालुका पोलीस ठाणे करीत आहे.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला