चारित्र्याच्या संशयावरून रागात गर्भवती पत्नीचा खून

नाशिक: चारित्र्याचा संशयावरून रागाच्या भरात पतीने १९ वर्षीय गर्भवती पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने पत्नीचा गळा आवळून खून करीत पत्नीचा मृतदेह गंगापूर रोडवरील शहिद अरुण चित्ते पुलाजवळील टाकून दिला. मात्र पोलीस तपासात पतीचे बिंग फुटले. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

अमृताकुमारी विकीरॉय यादव (१९ सध्या रा. सातपूर, मूळ नेपाळ) असे मृत पत्नीचे नाव आहे. विकीरॉय यादव (२०) असे ताब्यात घेतलेल्या पतीचे नाव आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर रोडवरील आसाराम बापू आश्रमासमोरील नदीपात्रालगत झाडाझुडपात मंगळवारी सकाळी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. नाशिक तालुका पोलिसांनी मृतदेहाचे फोटो शहर व ग्रामीण पोलिसांना पाठवले. त्यामुळे वर्णन पंचवटी पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद असलेल्या महिलेशी जुळाले. मृतदेहावरील कपडे आणि टॅटू पाहून मृतदेह पत्नीचा असल्याचे पतीने सांगितले.

दरम्यान, चौकशीत पतीने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. चारित्र्याचा संशय व विवाहात सासरच्यांनी काहीही न दिल्याने माहेरून पैसे आणावे, यासाठी पत्नीचा छळ केला. त्याने पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केला व मृतदेह झुडूपात टाकून पळ काढला. त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची नोंद दिल्याचे पोलीस तपासात समोर आल्याचे वृत्त आहे. पुढील तपास नाशिक तालुका पोलीस ठाणे करीत आहे.

Comments
Add Comment

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर