जामखेडमध्ये मोकाट जनावरांची झुंडशाही

  37

शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा सुळसुळाट


जामखेड : शहरातील विविध भागात मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे. अनेक ठिकाणी जनावरे कळपाने फिरतात. याचा नागरीकांना त्रास होतो. तसेच वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो.


नगरपरिषदेने वारंवार सूचना देऊनही जनावरे मालक दक्षता घेत नाहीत. जनावरे तासंतास रस्त्याच्या मध्यभागी बसत असल्याने वाहनचालकांची तारांबळ उडून अनेकदा लहान-मोठे अपघात होतात.नगरपरिषद प्रशासनाने या प्रकाराची दखल घेऊन संबंधित जनावरांच्या मालकांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी येथे केली जात आहे.मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे शहरातील नागरिकांसह वाहनधारक तसेच व्यावसायिक हैराण झाले आहेत.



भटकी कुत्र्यांचा देखील उपद्रव आहे. जनावरांची झुंबड रस्त्यावर तसेच दुकानांसमोरील शेडमध्ये आश्रयासाठी येत असल्याने दुकानांसमोरील शेड व पायऱ्यांवर दररोज मलमूत्र पडलेले असते. व्यावसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.


शहरामध्ये शाळा, विद्यालये, महाविद्यालय असून विद्यार्थ्यांची ही मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत मोकाट जनावरांमुळे वेगाने जाणारी वाहने त्यांच्या पायावरून गेल्याने जनावरे जखमी होण्याच्या घटना घडत आहेत.



पोटात प्लास्टिक


कित्येक रहिवासी घरातील टाकाऊ खाद्यपदार्थ प्लॅस्टिक पिशव्यांत भरतात. या पिशव्यांची तोंड बंद करून ती रस्त्यावरील अडगळीत फेकून देतात. अशा पिशव्यांचा शोध घेऊन मोकाट जनावरे त्यातील अन्न पदार्थ प्लॅस्टिक पिशव्या खाऊन फस्त करतात. यामुळे जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक पिशव्यांचा कचरा जाऊन जनावरांना अपाय होऊन ती दगावतात. या सर्व पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाकडून मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या