जामखेडमध्ये मोकाट जनावरांची झुंडशाही

शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा सुळसुळाट


जामखेड : शहरातील विविध भागात मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे. अनेक ठिकाणी जनावरे कळपाने फिरतात. याचा नागरीकांना त्रास होतो. तसेच वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो.


नगरपरिषदेने वारंवार सूचना देऊनही जनावरे मालक दक्षता घेत नाहीत. जनावरे तासंतास रस्त्याच्या मध्यभागी बसत असल्याने वाहनचालकांची तारांबळ उडून अनेकदा लहान-मोठे अपघात होतात.नगरपरिषद प्रशासनाने या प्रकाराची दखल घेऊन संबंधित जनावरांच्या मालकांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी येथे केली जात आहे.मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे शहरातील नागरिकांसह वाहनधारक तसेच व्यावसायिक हैराण झाले आहेत.



भटकी कुत्र्यांचा देखील उपद्रव आहे. जनावरांची झुंबड रस्त्यावर तसेच दुकानांसमोरील शेडमध्ये आश्रयासाठी येत असल्याने दुकानांसमोरील शेड व पायऱ्यांवर दररोज मलमूत्र पडलेले असते. व्यावसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.


शहरामध्ये शाळा, विद्यालये, महाविद्यालय असून विद्यार्थ्यांची ही मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत मोकाट जनावरांमुळे वेगाने जाणारी वाहने त्यांच्या पायावरून गेल्याने जनावरे जखमी होण्याच्या घटना घडत आहेत.



पोटात प्लास्टिक


कित्येक रहिवासी घरातील टाकाऊ खाद्यपदार्थ प्लॅस्टिक पिशव्यांत भरतात. या पिशव्यांची तोंड बंद करून ती रस्त्यावरील अडगळीत फेकून देतात. अशा पिशव्यांचा शोध घेऊन मोकाट जनावरे त्यातील अन्न पदार्थ प्लॅस्टिक पिशव्या खाऊन फस्त करतात. यामुळे जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक पिशव्यांचा कचरा जाऊन जनावरांना अपाय होऊन ती दगावतात. या सर्व पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाकडून मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार