CCTV : मुंबईतील नालेसफाईच्या कामांवर ‘तिसरा’ डोळा ठेवणार नजर

प्रत्येक नालेसफाईच्या कामांच्या ठिकाणी बसवणार कॅमेरा


नालेसफाईच्या कामांमध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न


मुंबई : मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प कामांचा आढावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत नालेसफाईच्या कामांमध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, बृहमुंबई महानगरपालिकेच्यावतीने येत्या मार्च ते एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नालेसफाईच्या कामांमध्ये सीसी टिव्ही कॅमेरांचा वापर होणार असून प्रत्येक मोठ्या आणि छोट्या नाल्यांच्या ठिकाणी सीसी टिव्ही कॅमेरे बसवले जाणार आहे. या कॅमेरांच्या माध्यमांतून नालेसफाईच्या कामांवर महापालिका प्रशासन नियंत्रण तसेच देखरेख ठेवली जाणार आहे.


मुंबईतील मोठ्या आणि छोट्या नाल्यांसह मिठी नदीच्या सफाईसाठी बृहमुंबई महानगरपालिकेच्यावतीने सध्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या नालेसफाईच्या कामांसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया अंतिम होवून पुढील दोन वर्षांसाठी सुमारे ५०० कोटी रुपयांच्या कामांसाठी कंत्राटदारांची निवड केली जाणार आहे. मात्र, आजवर नालेसफाईच्या कामांबाबत घोटाळ्याचे आरोप वारंवार होत असून या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक नाल्यांच्या ठिकाणी सीसी टिव्ही बसवण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरु आहे. मात्र, प्रत्येक वेळी नालेसफाईच्या कामाच्या ठिकाणी सीसी टिव्ही बसवण्यास टाळाटाळ केली जात होती. परंतु आगामी नालेसफाईच्या कामांच्या ठिकाणी आता सीसी टिव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक नाल्यांच्या ठिकाणी कंत्राटदाराच्या माध्यमातून सीसी टिव्ही कॅमेरे बसवले जाणार असून या कॅमेरांच्या माध्यमातून कामांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.



एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचे निर्देश


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नालेसफाईच्या कामांमध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचे निर्देश दिले असून प्रशासनाने या कामांमध्ये कंत्राटदारांना सीसी टिव्ही कॅमेरे बसवण्याची सक्ती केल्याने एकप्रकारे या कामांमध्ये पारदर्शकता राहिल आणि प्रत्येक अर्धा तासाने याची व्हिडीओ सेव केले जातील असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी प्रत्येक दिवशी केलेल्या कामांचे व्हिडीओ अपलोड केले जायचे, पंरतु आता प्रत्यक्ष काम सुरु असताना बृहमुंबई महानगरपालिकेतून अधिकाऱ्यांना तसेच कंत्राटदारांसह सामान्य जनतेलाही पाहता येणार आहे,असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,