Water Shortage : उन्हाळ्याच्या तोंडावर त्र्यंबकेश्वरात पाणीबाणी!

त्र्यंबकेश्वर : त्रंबकेश्वर येथे एक दिवसाआड पाणीपुरवठा त्रिंबक नगर परिषदेने मार्चपासून सुरू केला आहे. त्रंबकेश्वर मध्ये मे महिन्यात मोठी पाणीटंचाई जाणवते हे लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन लक्षात घेऊन व वाढता उन्हाळा लक्षात घेऊन नगरपालिकेने यंदा मार्च महिन्यापासूनच पाणी कपात सुरू केली आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. नगरपालिका पाणीपुरवठा विभागातून वरील माहिती देण्यात आली. (Water Shortage)



ज्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये असलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये पडणाऱ्या पावसाने मुंबई ठाणे मराठवाडा नाशिक नगर सह अन्य काही भागांमध्ये पाणीपुरवठा करण्याची क्षमता आहे त्याच त्र्यंबक नगरीमध्ये पाण्याची टंचाई जाणू लागली आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने आता एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे भविष्यामध्ये पाणी पुरले पाहिजे या दृष्टिकोनातून ही पावलं उचलली जात असल्याचे नगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून सांगितले जात असले तरी देखील त्र्यंबकेश्वरला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाणीसाठा कमी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे त्यामुळेच पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.दरम्यान मार्च मार्च एंड लक्षात घेऊन नागरिकांनी थकीत व चालू घरपट्टी पाणीपट्टी वेळेत भरून सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या कर विभागाने वसुली विभागाने पाणीपट्टी विभागाने केले आहे. एप्रिल मे अखेर अथवा पाऊस लांबल्यास दोन दिवसाआड पाणीपुरवठा देखील होऊ शकतो. १८ ते २० हजार लोक वस्तीसाठी ही स्थिती आहे. तर दुसरीकडे भव्य दिव्य सिंहस्थ कुंभमेळ्याची स्वप्न रंगवली जात आहे.


कुंभमेळ्यासाठी गौतमी गोदावरी धरणातून ज्यादा पाणी उचलण्याची योजना होणार आहे. नियोजन आहे. पण ती पुरेशी होईल काय ? अशी देखील नागरिकांना काळजी पडला आहे. थोडक्यात गोदावरीच्या उगमस्थानला तहान लागली आहे.

Comments
Add Comment

Mahayuti : विधान परिषदेच्या पुण्याच्या जागेसाठी महायुतीतच चुरस

जिल्ह्यात महायुतीचे ७३४ सदस्य आहेत. मात्र, आपल्या या पारंपरिक हक्काच्या जागेवर दावा सांगणारा अजित पवार गट आणि

Pune Porsche Car Accident Case : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात नवा वाद! जामिनावर सुटल्यानंतर अग्रवाल कुटुंबाची जंगी पार्टी, VIDEO व्हायरल

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिली होती.

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे आता सिनेमातून उलगडणार, लवकरच भोंदू खरातचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

Ashok Kharat : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण नाशिकमध्ये समोर आले आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. खरात प्रकरणाने

NEET 2026 Paper Leak : मोटेगावकर अडचणीत; CBIला घरातूनच मिळाला महत्त्वाचा साक्षीदार

नवी दिल्ली : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

NEET Paper Leak Case : NEET पेपरफुटी रॅकेटचा पर्दाफाश; १० ते १२ लाखांत विकला जात होता पेपर

लातूर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील धागेदोरे आता लातूरमध्ये अधिकच मजबूत होताना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 143 व्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी ‘त्रिवेणी’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला