Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन – "न्यायाला विलंब होऊ नये, आम्ही कटिबद्ध"

मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे (Santosh Deshmukh Murder Case) फोटो समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला. या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अधिकृत निवेदन (NCP statement after Dhananjay Munde's post) जारी करण्यात आले आहे.



संतोष देशमुख हत्येप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी


या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, संतोष देशमुख हत्येप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, ही पक्षाची ठाम भूमिका आहे. बीडसह संपूर्ण राज्यभरातील पक्षाच्या नेत्यांनीही याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र, नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी स्वतः राजीनामा दिला, ही सकारात्मक बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.





पक्ष कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळावा यासाठी वचनबद्ध


राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे की, पक्ष कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळावा यासाठी वचनबद्ध आहे आणि न्यायप्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप करणार नाही. धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊन नैतिकता जपली असून, न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचे पक्षाने सांगितले. या प्रकरणाची चौकशी कोणत्याही दबावाशिवाय पार पडेल, असे आश्वासनही निवेदनातून देण्यात आले आहे.



आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही आमची अपेक्षा


संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो असाच चालू राहून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही आमची अपेक्षा आहे. हे प्रकरण न्यायालयीन असून तपास सुरू असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो की कोणत्याही गुन्ह्याला, गैरकृत्याला पक्षाचे किंवा आमच्या नेत्यांचे कधीही समर्थन असणार नाही. आजच्या घटनेतून हाच संदेश राज्याला गेला आहे.





न्याय व्यवस्था आणि कायदा यावर आमचा पूर्ण विश्वास


या प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक महत्त्वाचा संदेश देत आहे. न्याय व्यवस्था आणि कायदा यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या कामात आम्ही कधीही हस्तक्षेप करणार नाही. न्यायाला विलंब होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.


Comments
Add Comment

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास

'बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवणार'

मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा

अचानक डिजिटल ब्लॅकआउट; Cloudflare बंद पडताच अनेक अ‍ॅप्स ठप्प !

मुंबई : जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना आज सकाळपासून अचानक अनेक डिजिटल सेवांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा

Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ३ साठी पादचारी कनेक्टिव्हिटी मजबूत; वरळी व BKC येथे उभारले जाणार दोन मोठे सबवे

मुंबई : मुंबईतील ‘अक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन ३ च्या प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, छोटे भूखंड आता 'विनाशुल्क' नियमित होणार

मुंबई : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक