Nitesh Rane : '...यांना औरंगजेबाच्या शेजारीच कबरीत पुरले पाहिजे'; अबू आझमीच्या विधानावर मंत्री नितेश राणे संतापले!

मुंबई : अबू आझमी (Abu Azmi) यांनी औरंगजेबावर केलेल्या विधानावरून महाराष्ट्रात राजकीय गदारोळ सुरू आहे. काल (३ मार्च) आझमी यांच्या वक्तव्याच्या मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशन दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर आज देखील हे अधिवेशन उद्यावर ढकलण्यात आले आहे. दरम्यान, अबू आझमीने केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला जात आहे. अशातच मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील अबू आझमीवर घणाघात केला आहे.



"छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू स्वराज्य स्थापन केले. मुघलांनी आपली हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली, लोकांचे धर्मांतर केले, शिवाजी महाराजांनी याविरुद्ध आवाज उठवला आणि जर अबू आझमी हे समजू शकले नाहीत तर त्यांनाही औरंगजेबाकडे पाठवावे लागेल. निलंबनाने काहीही होणार नाही, त्यांना औरंगजेबाच्या शेजारीच कबरीत पुरले पाहिजे," असे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी म्हटले आहे.



अबू आझमींनी इतिहास वाचला पाहिजे - शायना एनसी


शिवसेना महिला नेत्या शायना एनसी यांनीही अबू आझमींच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "अबू आझमी यांनी प्रथम इतिहासाची पाने उलटावीत जेणेकरून त्यांना कळेल की औरंगजेबाने किती हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली. यामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर आणि काशी विश्वनाथच्या शेजारी असलेले छोटे मंदिर समाविष्ट आहे."

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात